

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
शहरातील मेहरूण भागात झालेल्या भांडणं सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा 2011 खून झाला होता. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने एका आरोपीला जन्मठेप तर दुसऱ्या आरोपीला निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
मेहरूण भागात ६ फेब्रुवारी २०११ रोजी सुरेश बंजारा याचे काही लोकांशी भांडण सुरु होते. हे भांडण सोडवण्यासाठी मयत आसाराम पवार हा मध्यस्थी करीत होता . या झटापटीत कल्लुसिंग राजपूत याने आसाराम पवारच्या छातीवर डाव्या बाजूला चाकूने वार केले होते . गंभीर जखमी झालेल्या आसाराम पवार याचे उपचार सुरु असताना शासकीय रुग्णालयात निधन झाल्यांनतर पोलिसांनी या गुन्ह्यात ३०२ या कलमाची वाढ केली होती . आसाराम पवार यांच्या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात आरोपी कल्लुसिंग राजपूत व जितेंद्र शंकरसिंग राजपूत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता .
पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते . या खटल्यात न्यायालयासमोर ५२ कागदपत्रे ठेवून ६ साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या होत्या . सुनावणी पूर्ण झाल्यांनतर आज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस डी जगमलानी यांनी दोषी कल्लुसिंग राजपूत याला जन्मठेपेसह ५ हजार रुपये दंडाची आणि दंड न भरल्यास ३ महिने सध्या कारावासाची शिक्षा सुनावली . दुसरा आरोपी जितेंद्र राजपूत याची निर्दोष मुक्तता केलीय. या खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲड. प्रदीप महाजन यांनी युक्तिवाद केला. त्यांना पेरावी अधिकारी राजेंद्र सैंदाणे यांनी सहकार्य केले.