China : चीनचा नवा डाव, बांग्लादेश-पाकिस्तानसोबत त्रिपक्षीय बैठक; भारताच्या चिंतेचे कारण काय?

China Pakistan Bangladesh meeting : चीनने इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तान आणि बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांची त्रिपक्षीय बैठक आयोजित केली होती. बैठकीत काय ठरले? आणि भारताच्या चिंतेचे कारण काय? वाचा सविस्तर
China Pakistan Bangladesh meeting
China Pakistan Bangladesh meetingfile photo
Published on
Updated on

China Pakistan Bangladesh meeting :

नवी दिल्ली : चीनने गुरुवारी इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तान आणि बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांची त्रिपक्षीय बैठक आयोजित केली होती. चीनच्या युनान प्रांतातील कुनमिंग शहरात ही बैठक झाली. भारत-बांगलादेश संबंध अस्थिर असताना भारताच्या दृष्टीने या घडामोडी राजनैतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.

बैठकीत काय ठरले?

बैठकीला चीनचे उप परराष्ट्र मंत्री सुन वेइदोंग, बांगलादेशचे काळजीवाहू परराष्ट्र सचिव रुहुल आलम सिद्दीकी, पाकिस्तानच्या आशिया-पॅसिफिक विभागाचे अतिरिक्त सचिव इम्रान अहमद सिद्दीकी आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव अमना बलोच व्हिडिओ लिंकद्वारे सहभागी झाल्या होत्या. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार, या बैठकीत तिन्ही देशांनी व्यापार, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण, सागरी व्यवहार आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीसह बहुपक्षीय सहकार्य वाढविण्यावर सहमती दर्शवली. बैठकीदरम्यान एक कार्यगट स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला, जो या बैठकीत झालेल्या करारांची अंमलबजावणी करण्यासाठी काम करेल.

China Pakistan Bangladesh meeting
Israel-Iran conflict Oil price : महागाई वाढणार! अमेरिका युद्धात उतरल्यास भारतावर काय परिणाम होणार?

चीनने काय म्हटले? 

चिनी मंत्रालयाच्या निवेदनानुसार, हे त्रिपक्षीय सहकार्य कोणत्याही तिसऱ्या देशाच्या विरोधात नाही आणि ते खऱ्या बहुपक्षवादाला आणि खुल्या प्रादेशिकतेला प्रोत्साहन देते. भारताची चिंता यापेक्षा वेगळी आहे. पाकिस्तान-बांगलादेश समीकरणात बदल दिसून येत आहेत. पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यकाळात पाकिस्तान आणि बांगलादेशचे संबंध बरेच शांत होते. पण ऑगस्टपासून पाकिस्तानने अंतरिम सरकारसोबत संरक्षण, व्यापार आणि मुत्सद्देगिरीसह अनेक क्षेत्रांमध्ये संबंध वेगाने मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. असे मानले जाते की पाकिस्तानची आयएसआय आणि लष्कराने शेख हसीना यांना सत्तेतून दूर करण्यात मोठी भूमिका बजावली.

चीनची भूमिका आणि रणनीती

शेख हसीना सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर सुरुवातीला चीन थोडा मागे हटला होता, पण आता त्याने अंतरिम शासनासोबत आर्थिक भागीदारीद्वारे पुन्हा आपला प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. हे त्रिपक्षीय व्यासपीठ भारताच्या 'नेबरहुड फर्स्ट' धोरणाला आणि प्रभावाला थेट आव्हान देत असल्याचे दिसते.

भारत चिंतेत का ?

पाकिस्तानने नोव्हेंबरपासून आतापर्यंत चट्टोग्राम बंदरातून दोन व्यावसायिक जहाजे पाठवली आहेत. या घटना बंगालच्या उपसागरातील भारताच्या प्रवेशास अडथळा आणण्याचा प्रयत्न मानल्या जात आहेत. भारतासाठी हे सामरिकदृष्ट्या चिंताजनक आहे, कारण बांगलादेश हा भारताचा एक प्रमुख शेजारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news