CDS Anil Chauhan | पाकिस्तानबाबत सहनशीलता संपली! रेडलाईन ओलांडू नका; भारत-पाकिस्तानचे लष्करी प्रमुख सिंगापूरमध्ये भिडले

CDS Anil Chauhan | 'शांग्री-ला डायलॉगम'मध्ये उमटले ऑपरेशन सिंदूरचे पडसाद
CDS anil chauhan - General Sahir Mirza
CDS anil chauhan - General Sahir MirzaPudhari
Published on
Updated on

CDS Anil Chauhan in Shangri-La Dialogue 2025 Singapore Operation Sindoor

सिंगापूर : भारत-पाकिस्तानमधील लष्करी तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. सिंगापूरमधील शांग्री-ला संवाद परिषद 2025 मध्ये भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान आणि पाकिस्तानचे जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष जनरल साहिर शमशाद मिर्झा आमनेसामने भिडले.

दोघांमधील परस्पर आरोप-प्रत्यारोपांनी भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाची झलक पाहायला मिळाली. या परिषदेत दोन्ही देशांच्या लष्करी प्रमुखांनी परस्पर धोरणांवर कठोर शब्दांत भाष्य केलं.

यावेळी CDS जनरल अनिल चौहान यांनी ''रेडलाईन ओलांडू नका, पाकिस्तानबाबत सहनशीलता संपली आहे,'' अशा शब्दांत पाकिस्तानला इशारा दिला.

दरम्यान, 'ऑपरेशन सिंदूर', दहशतवादविरोधातील कारवाई आणि काश्मीर प्रश्न यावरून दोन्ही देशांतील वादाने आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले.

काय म्हणाले CDS जनरल अनिल चौहान ?

CDS जनरल अनिल चौहान यांनी आपल्या भाषणात नुकत्याच पार पडलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' चा उल्लेख करत भारताने दहशतवादाविरोधात "नवीन रेड लाईन" आखली असल्याचे सांगितले.

ते म्हणाले की, “भारताला गेल्या दोन दशकांहून अधिक काळ दहशतवादाच्या छुप्या युद्धाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये आपण अनेक नागरिक गमावले आहेत. आता ही सहनशीलता संपवायची वेळ आली आहे,” असे ते म्हणाले.

त्यांनी असेही सांगितले की, पाकिस्तानने भारताच्या या लष्करी कारवाईतून धडा घ्यावा आणि भारताच्या मर्यादेची जाणीव ठेवावी.

CDS anil chauhan - General Sahir Mirza
PM Narendra Modi | सहा वर्षात पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी G7 शिखर परिषदेला अनुपस्थित राहणार; खलिस्तानी धोका...

पाकिस्तानकडून 'काश्मीर मुद्दा' पुन्हा ऐरणीवर

दुसरीकडे, पाकिस्तानचे जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनी संवाद परिषदेत “काश्मीर प्रश्नाच्या कायमस्वरूपी समाधानाची आवश्यकता” यावर जोर दिला.

ते म्हणाले की, “भारत आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या सर्व तणावांचे मूळ हे काश्मीर आहे आणि याचे युनायटेड नेशन्स सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार आणि काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार समाधान होणे गरजेचे आहे.”

ते पुढे म्हणाले, “सध्या भारताच्या धोरणांमुळे संवादाचा मार्ग खुंटतो आहे. परिणामी, कोणताही संघर्ष वेगाने भडकू शकतो आणि तेव्हाही आंतरराष्ट्रीय शक्तींना हस्तक्षेप करण्यासाठी वेळ मिळणार नाही.”

अमेरिकेसह ब्रिटन, तुर्किये, सौदी, चीन आणि यूएईकडून मध्यस्थीचे प्रयत्न

भारताने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू करून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. हे पाऊल 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 26 पर्यटकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात उचलण्यात आले होते.

ही लष्करी कारवाई चार दिवस सुरू राहिली आणि 10 मे रोजी दोन्ही देशांमध्ये लष्करी कृती थांबवण्याबाबत परस्पर समझोता करण्यात आला.

पाकिस्तानकडून जनरल मिर्झा यांनी सांगितले की, अमेरिकेसह ब्रिटन, तुर्किये, सौदी अरेबिया, चीन आणि यूएई या देशांनी या संघर्षात मध्यस्थीचे प्रयत्न केले.

CDS anil chauhan - General Sahir Mirza
Priyanka Chaturvedi | भारतात G20 तर पाकिस्तानात T20 म्हणजे टॉप 20 दहशतवादी; लंडनमध्ये प्रियंका चतुर्वेदी यांचा पाकवर घणाघात

युद्धाची शक्यता वाढली...

जनरल मिर्झा यांनी असा इशारा दिला की, सध्याच्या लष्करी तणावामुळे भारत-पाकिस्तानमधील युद्धाचा उंबरठा खूपच कमी झाला आहे. यामुळे केवळ सीमावर्ती भागच नव्हे, तर संपूर्ण भारत आणि पाकिस्तानमध्ये धोक्याची शक्यता वाढली आहे.

त्यांनी पाश्चिमात्य देशांकडून भारताला “नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर” म्हणून उचलून धरण्यालाही दोष दिला आणि म्हटले की, हे भारताला संवाद टाळण्यास प्रोत्साहन देत आहे.

दरम्यान, शांग्री-ला संवाद परिषदेमधील या शाब्दिक सामन्याने दोन्ही देशांमध्ये तणाव शिगेला पोहोचला आहे.

दक्षिण आशियामध्ये दीर्घकालीन शांतता हवी असल्यास, केवळ संघर्ष व्यवस्थापन नव्हे तर संघर्षाचे मूळ कारण दूर करणे आवश्यक आहे, असा सूर दोन्ही बाजूंनी उमटतो आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news