Operation Kaveri: सुदानमधून १३५ भारतीयांची तिसरी तुकडी रवाना | पुढारी

Operation Kaveri: सुदानमधून १३५ भारतीयांची तिसरी तुकडी रवाना

पुढारी ऑनलाईन: ‘सुदान’मध्ये दोन गटात यादवी युद्धाची ठिणगी पडली आहे. या संघर्षात शेकडो जणांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान कित्येक भारतीय सुदानमध्ये अडकले आहेत. सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन कावेरी (Operation Kaveri) राबवले जात आहे. याचा तिसरा टप्पा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला आहे. १३५ जणांची तिसरी तुकडी भारतात येण्यासाठी विमानाने रवाना झाली आहे.

सुदानचे लष्करप्रमुख जनरल अब्देल फताह बुरहान आणि ‘रॅपिड सपोर्ट ग्रुप’ (आर.एस.एफ.) या निमलष्करी दलाचे प्रमुख जनरल मोहम्मद हमदान दगालो या दोन ताकदवान नेत्यांमध्ये सत्तेसाठी संघर्ष पेटला आहे. या यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, भारताकडून या कालावधीत ऑपरेशन कावेरी(Operation Kaveri) राबविण्यात येत आहे.

काल (दि.२५) परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन कावेरी अंतर्गत २८७ जणांची पहिली तुकडी भारतात येण्यासाठी रवाना झाली होती. त्यानंतर IAF C-130J हे पहिले विमान १२१ जणांना घेऊन सुदान पोर्टमधून रवाना झाले आहे. त्यानंतर सुदान पोर्टमधून १३५ भारतीयांचा समावेश असलेली तिसरी तुकडी IAF C-130J विमानाने जेद्दाह येथे पोहोचली आहे. दरम्यान, ही दोन्ही विमाने भारताकडे येण्यासाठी जेद्दाहमध्ये पोहोचले आहेत. या सर्वांसाठी भारताचा पुढील प्रवास लवकरच सुरू होईल, असे मंत्री मुरलीधरन यांनी त्यांच्या ट्विटरवरून (Operation Kaveri) सांगितले आहे.

सोमवारी (दि.२५) कोची येथे युवाम कॉन्क्लेव्हला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, “सुदानमध्‍ये अडकलेल्‍या (Sudan clashes) भारतीयांना मायदेशात सुखरूप आणण्यासाठी आम्ही ‘ऑपरेशन कावेरी’ (Operation Kaveri) सुरू केले आहे. हे ऑपरेशन केरळचे सुपुत्र आणि आमच्या सरकारमधील मंत्री मुरलीधरन यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे.

हेही वाचा:

Back to top button