T20 World Cup : सराव सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर ६ धावांनी रोमांचक विजय

INvAUS
INvAUS
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियात काल (दि. १६ ऑक्टोबर) पासून टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली असून आजच्या दुसऱ्या दिवशी भारताचा सराव सामना आस्ट्रेलियाशी झाला. या सराव सामन्यात भारताने आस्ट्रेलियावर ६ धावांनी रोमांचक विजय मिळवला. अखरेच्या षटकांत मोहम्मद शमीने सामना फिरवला. मोहम्मद शमीची अखेरच्या षटकातील भेदक गोलंदाजी आणि विराट कोहलीच्या दमदार फिल्डिंगच्या जोरावर हा सामना भारताने जिंकला. शमीने एका षटकात ४ धावांच्या बदल्यात ३ विकेट घेतल्या.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादव ५० धावा आणि केएल राहुलच्या ५७ धावांच्या जोरावर भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १८६ धावा केल्या होत्या. हे लक्ष्य पार करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ २० षटकांत १८० ऑलआउट झाला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने ५४ चेंडूत ३ षटकार आणि ७ चौकार ठोकत ७६ धावांची खेळी केली.

हे वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news