

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अटल सेतूचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंद आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या पुलाचे नाव भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून अटल सेतू असे देण्यात आले आहे. (Atal Setu inauguration)
या सेतुच्या कामाची सुरूवात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना झाली होती. त्यामुळे दोन्ही मंत्र्यांसाठी हा प्रकल्प महत्वकांक्षी मानला जात आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 18 हजार कोटी रूपयांचा खर्च आला आहे. अटल सेतू प्रकल्पाचे उद्धाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आले. या प्रकल्पमुळे मुंबईसह, नवी मुंबई, रायगड आणि इतर शहरांमधील अंतर केवळ 20 मिनिटात कापता येणार आहे. (Atal Setu inauguration)
एरवी दक्षिणेकडून उत्तरेकडे मुंबईचे रस्ते एका रेषेत आजवर वाहत आले आहेत. या एकाच रेषेवर इतकी गर्दी की. सकाळ-संध्याकाळ फक्त रेटारेटी सुरू असते. ही रेटारेटी लोकलच्या डब्यांत आणि रस्त्यांवरच्या वाहनांचीदेखील मुंबई अनुभवत आली. या अफाट गर्दीमुळेच लाखो मुंबईकर फक्त प्रवासात रोज चार ते सहा तास घालवतात. हे प्रवासात चाललेले आयुष्य कदाचित अटल सेतूमुळे आता बदलेल.
शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर म्हणजेच अटल सेतूमुळे दक्षिण मध्य मुंबईत वरळी आणि शिवडी खाडीवर जोडले गेले आणि हीच दक्षिण मुंबई अरबी समुद्र पार करीत आता नवी मुंबईत चिर्ले गावाशी आपले बंधार्याचे नाते सांगू लागेल. दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई प्रवासाला जिथे आज किमान 3 तास लागतात तिथे हे अंतर अटल सेतूवरून म्हणजे वरळी किंवा शिवडी ते चिर्ले फक्त अर्ध्या तासात पार करता येईल. या सेतूने नवी मुंबईच्या नावात खर्या अर्थाने मुंबई आणली आहे. याचा अर्थ नवी मुंबईचा प्रचंड मोठा परिसर नरीमन पॉईंट किंवा लोअर परळच्या अगदी निकट नेऊन ठेवला आहे. या सेतूचे एक टोक आजच्या वरळी-वांद्रे सी-लिंकच्या जवळ टेकले असल्याने मुंबईच्या पश्चिम उपनगरांनाही हा सेतू नवी मुंबईशी थेट जोडतो आहे.
अटल सेतूवर हा अत्याधुनिक पुल आहे. यावर वाहतूक नियंत्रणासाठी विशिष्ट यंत्रणा बसवण्यात आली आहे. अटल सेतुवरील वाहतुकीवर यंत्रणा ठेवण्यासाठी इंटिलिजेंट ट्राफिक मॅनेजमेन्ट सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणे अंतर्गत अटल सेतूवर विविध प्रकारचे तब्बल 400 कॅमेरे बसवण्यात आले आहे. यामुळे सेतुवर नियमांचे उल्लंघन करणारे वाहन अत्याधुनिक कॅमेऱ्यात सेकंदात कैद होणार आहेत. अशा वाहन चालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. (Atal Setu inauguration)
अटल सेतू महामार्गाची रचना ताशी 100 किमी वेगमर्यादेनुसार करण्यात आली आहे. यापूर्वी महामार्गावरून ताशी 80 किमी वेगमर्यादा ठेवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला होता. मात्र आता सेतू वाहतुकीसाठी खुला होत असताना एमएमआरडीएने ताशी 100 किमी अशी वेगमर्यादा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.
एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार सागरी सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणेअंतर्गत सुमारे 400 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यात 130 हाय डेफिनिशन पीटीझेड कॅमेरे, 190 आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित थर्मल कॅमेरे, 36 अंडर ब्रिज कॅमेरे, 12 सेक्शन स्पीड आणि 22 स्पॉट स्पीड कॅमेरे यांचा समावेश आहे. इतक्या अत्याधुनिक सुविधांमुळे अटल सेतूवरील प्रवास सुरक्षित होणार असल्याचंही एमएमआरडीएचं म्हणणं आहे.
अटल सेतुवर प्रवास करण्यासाठी दुचाकी, ट्रॅक्टर, रिक्षा आणि अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. अवजड वाहनांना वाहनांना पुढे जाण्यासाठी मुंबई पोर्ट-शिवरी या मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
हेही वाचा :