भारत गौरवची तिसरी रेल्वे 23 तारखेला मुंबईतून सुटणार

भारत गौरवची तिसरी रेल्वे 23 तारखेला मुंबईतून सुटणार
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: केंद्र शासनाच्या देखो अपना देश या मोहिमेअंतर्गत असलेली भारत गौरवची तिसरी रेल्वेगाडी येत्या 23 तारखेला मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून सुटणार आहे. तर 2 जून रोजी पुन्हा ती मुंबईला येणार आहे. या गाडीला आयआरसीटीसीकडून 'श्री रामेश्वरम-तिरुपती : दक्षिण यात्रा' असे नाव देण्यात आले असून, ही गाडी मुंबई-म्हैसुर-बेंगळुरू-कन्याकुमारी-तिरूअनंतपुरम-रामेश्वरम-मदुराई-तिरुपती-मुंबई अशी धावेल.

भारत गौरव यात्रेची पहिली गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून 28 एप्रिल रोजी सुटली. ही गाडी 'पुरी-गंगासागर दिव्य काशी यात्रा' या नावाने धावली. त्यानंतर दुसरी गाडी 11 मे रोजी पुण्यातून सुटली. ही गाडी 'महाकालेश्वर संग उत्तर भारत देवभूमी यात्रा' या नावाने उत्तर भारतातील पर्यटन स्थळांसाठी सोडण्यात आली होती. आता ही तिसरी गाडी मुंबईतून सुटणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news