गोव्याची चिंता मिटली: तिलारी धरण ८० टक्के भरले; विसर्ग सुरू

तिलारी नदीत प्रतिसेकंद ४६. ३८० घ. मी. विसर्ग
Tilari dam
तिलारी धरण ८० टक्के भरले असून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.Pudhari News Network
Published on
Updated on

पणजी: पुढारी वृत्तसेवा: गोवा आणि महाराष्ट्राचे संयुक्त धरण असलेल्या 'तिलारी ' धरणातून अखेर सोमवारी (दि. १५) पहाटे साडेतीन वाजता विसर्ग सुरू करण्यात आला. खळग्यातील धरणातून सायंकाळी ५ वाजता प्रतिसेकंद ४६.३८० घ.मी.पाणी पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्यात आले.

Tilari dam
म्हादई : कर्नाटक-गोवा संघर्षात ‘प्रवाह’

Summary

  • तिलारी धरण ८० टक्के भरले

  • प्रतिसेकंद ४६.३८० घ.मी. पाणी तिलारी नदीत

  • २४ तासांत पाण्याच्या पातळीत ५ टक्क्यांनी वाढ

विनायक जाधव यांच्याकडून धरणावर जलपूजन

यावेळी सावंतवाडी येथील कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी धरणावर जलपूजन केले. यावेळी उपविभागीय अभियंता गजानन बुचडे व अन्य कर्मचारी उपस्थित होते. गोव्याला पाणीपुरवठा करणारे तिलारी धरण सध्या ८०.१८ टक्के भरले आहे. गेल्या २४ तासांत धरणक्षेत्रात १२५.४ मिमी पाऊस पडला. गेल्या २४ तासांत धरणातील पाण्याची पातळी ५ टक्क्याने वाढली. सध्या धरणात ३५८.६९९ द. ल. घ. मी. एवढा पाणीसाठा आहे. खळग्यातील धरणाच्या सांडव्यावरून प्रतिसेकंद ४६.३८० घ. मी. पाणी पुच्छ कालव्यातून तिलारी नदीत सोडण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news