मडगाव : पुढारी वृत्तसेवा; केपेत भाजप मंडळातर्फे केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणारी पत्रके वाटण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षांच्या कारकिर्दीत कोणत्या कल्याणकारी योजना मार्गी लागल्या, यासंबंधी पत्रकांमध्ये नमूद करण्यात आली होती. ही पत्रके बेतुल पंचायत क्षेत्रात वितरित करण्यात आली. आठ वर्षांपूर्वी देश कसा होता आणि त्यानंतर कोणता विकास झाला यासंबंधी नागरिकांना माहिती देण्यात येणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बेतुलचे सरपंच सेबी फर्नांडीस, उपसरपंच किलेम्के फर्नांडीस, मंडळ अध्यक्ष संजय वेळीप, पंचसदस्य तातो केरकर, गुरूदास वेळीप, आकांक्षा नाईक, महिला मोर्चाच्या अध्यक्ष शीतल नाईक, पंचसदस्य मेदिनी नाईक, माजी सरपंच आनंद तोणके आदी उपस्थित होते.