

Garuda Purana:
मृत्यूच्या वेळी नक्की काय होतं? माणसाला काय दिसतं? या गूढ प्रश्नांची उत्तरे भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांच्यातील संवादातून 'गरुड पुराणात' मिळतात. मरण्यापूर्वीच्या त्या अखेरच्या ५ मिनिटांचा थरार आणि त्यानंतरचा प्रवास गरुड पुराणात सविस्तर मांडण्यात आला आहे.
गरुड पुराणातील पहिल्या अध्यायानुसार, जेव्हा यमलोकातून बोलावणे येते, तेव्हा माणसाच्या संवेदना आणि इंद्रिये शिथिल होऊ लागतात. मृत्यूच्या बरोबर ५ मिनिटे आधी माणूस एका विलक्षण अवस्थेत प्रवेश करतो, ज्याला 'दिव्य दृष्टी' प्राप्त होणे असे म्हणतात. यावेळी त्याच्या संपूर्ण आयुष्यातील चांगल्या-वाईट घटना एखाद्या चित्रपटासारख्या डोळ्यासमोरून तरळून जातात. त्या क्षणी वाचा बसते आणि इच्छा असूनही माणूस बोलू शकत नाही. याच वेळी यमदूत समोर प्रकट होतात. पुण्यवान आत्म्याला ते देवदूताप्रमाणे भासतात, तर पापी जिवांना त्यांचे रूप अत्यंत भयानक आणि भीतीदायक वाटते.
मृत्यूनंतर आत्म्याचा यमलोकाकडे प्रवास सुरू होतो. हा मार्ग अत्यंत कठीण असून वाट रक्ताने माखलेली 'वैतरणी' नदी लागते. या नदीतील भयानक प्राणी आणि मगरी पापी आत्म्यांना त्रास देतात. राजा श्वेताची कथा यात महत्त्वाची आहे; ज्याने आयुष्यभर दान दिले पण पितृ तर्पण केले नाही, ज्यामुळे त्याला मृत्यूनंतर सोन्याचा महाल मिळाला पण अन्नाविना तडफडावे लागले.
यमराजाच्या सभेत चित्रगुप्त प्रत्येक आत्म्याच्या कर्माचा लेखाजोखा मांडतात. इथे सत्य लपवणे अशक्य असते.
तप्त कुंभ नर्क: धन हडपणाऱ्यांना या नरकात शिक्षा मिळते.
रौरव नर्क: गुरु आणि थोरामोठ्यांचा अपमान करणाऱ्यांना इथे यातना भोगाव्या लागतात.
भगवान विष्णूंनुसार, जे लोक गोदान, अन्नदान आणि जलसेवा करतात, त्यांना हा प्रवास सुसह्य होतो.
'गरुड पुराणा'त असे नमूद केले आहे की, जी स्त्री धार्मिक कर्तव्यभावनेने आपल्या कुटुंबाची सेवा करते, तिला 'स्वर्ग' प्राप्त होतो. जो पुरुष आपली पत्नी, कुटुंब आणि मुलांशी आदराने वागतो, त्याला 'पितृलोक' प्राप्त होतो. याउलट, जी व्यक्ती कुटुंबात कलह आणि द्वेष निर्माण करते, तिला एका अंधकारमय आणि खोल अशा नरकात ढकलले जाते; जिथे तिला दीर्घकाळापर्यंत यातना सहन करण्यास भाग पाडले जाते.
गरुड पुराणात मृत्यूच्या १० दिवसांपर्यंत केल्या जाणाऱ्या पिंडाला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. या विधीमुळे आत्म्याला 'सूक्ष्म शरीर' प्राप्त होते, ज्यामुळे तो यमलोकाचा प्रवास करू शकतो. जर श्राद्ध आणि तर्पण विधीपूर्वक केले नाही, तर आत्मा प्रेत योनीत अडकून राहतो आणि त्याला मानसिक क्लेश सहन करावे लागतात.
ऋषी वशिष्ठांच्या उपदेशानुसार, शरीर हे केवळ एका वस्त्राप्रमाणे आहे जे आत्मा वेळोवेळी बदलत असतो. ८४ लाख योनींनंतर मिळणारा मानवी जन्म हा अत्यंत दुर्मिळ असून, तो केवळ सत्कर्मानेच प्राप्त होतो. मृत्यूच्या वेळी देवाच्या नावाचा जप, गंगाजल आणि तुळशीचे पान मुखात असल्यास आत्म्याला शांती आणि दिव्य मार्ग प्राप्त होतो.