

marriage delay astrology
अनेकदा सर्वगुणसंपन्न असूनही मुला-मुलींच्या लग्नामध्ये अडथळे येतात किंवा विनाकारण विलंब होतो. 'कांदेपोहे'चा कार्यक्रम होऊनही गोष्ट पुढे सरकत नाही. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, या विलंबामागे केवळ व्यावहारिक कारणे नसून कुंडलीतील ग्रहांची स्थिती, सप्तम भाव आणि विशिष्ट ग्रहदोष कारणीभूत असू शकतात. विशेषतः शनि, राहु-केतू आणि मंगळ यांसारख्या ग्रहांच्या प्रभावामुळे विवाहामध्ये अडथळा निर्माण होतो. विवाहातील विलंबामागील प्रमुख ज्योतिषीय कारणे आणि त्यावर करावयाचे उपाय जाणून घ्या.
वैदिक ज्योतिषामध्ये, जन्मकुंडलीतील बारा स्थानांपैकी, सातवे स्थान हे विवाह आणि जोडीदार यांचे प्रतिनिधित्व करणारे मुख्य स्थान मानले जाते. हे स्थान लग्नाच्या अगदी समोर स्थित असते आणि ही दोन्ही स्थाने एकमेकांची पूरक म्हणून कार्य करतात. जर सातव्या स्थानावर अशुभ ग्रहांची दृष्टी असेल, जर या स्थानाचा स्वामी (सप्तमेश) कमकुवत असेल, किंवा हे स्थान अशुभ ग्रहांच्या मध्ये सापडले असेल, तर विवाहामध्ये विलंब किंवा अडथळे निर्माण होण्याची दाट शक्यता असते. शिवाय, जर सातव्या स्थानाचा स्वामी सहाव्या, आठव्या किंवा बाराव्या स्थानात स्थित असेल किंवा त्यावर अशुभ ग्रहांचा प्रभाव असेल तर अडथळे निर्माण होतात.
ज्योतिषशास्त्रामध्ये, शनीला विलंब, शिस्त आणि कर्म यांचा ग्रह मानले जाते. त्याच्या संथ गतीमुळे, विवाहसारख्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांमध्ये तो अनेकदा विलंब घडवून आणतो. जेव्हा शनीचा प्रभाव सातव्या स्थानावर, सप्तमेशावर किंवा लग्नावर पडतो, तेव्हा विवाहामध्ये विलंब होतो. विशेषतः सिंह आणि कर्क लग्नाच्या व्यक्तींमध्ये हा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. शनि विलंबाने विवाह लावून देतो, मात्र असा विवाह दीर्घकाळ टिकणारा आणि स्थिर असतो, असेही मानले जाते.
जर कुंडलीत मंगळ लग्नस्थानी म्हणजे पहिल्या, चौथ्या, सातव्या, आठव्या किंवा बाराव्या स्थानी असेल, तर 'मंगळ दोष' निर्माण होतो. यामुळे लग्नात अडचणी किंवा वैवाहिक जीवनात वाद होण्याची शक्यता असते.
राहू आणि केतू यांना छाया ग्रह म्हटेल जाते ते विवाहात संभ्रम आणि अचानक अडथळे निर्माण करू शकतात. जर राहू किंवा केतू कुंडलीतील ७ व्या स्थानात स्थित असतील, किंवा त्यांनी ७ व्या स्थानाच्या अधिपतीवर प्रभाव टाकला असेल, तर विवाहामध्ये विलंब होण्याची किंवा नातेसंबंधांमध्ये वारंवार दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. 'कालसर्प दोष' हा देखील विवाहातील अडथळ्यांचे एक प्रमुख कारण ठरतो.
विवाहासाठी पुरुषाच्या कुंडलीत शुक्र आणि स्त्रीच्या कुंडलीत गुरु हा प्रमुख कारक ग्रह असतो. जर हे ग्रह कमकुवत असतील किंवा पापग्रहांच्या छायेत असतील, तर विवाहाची चर्चा फलद्रूप होत नाही. गुरु हा वैवाहिक सुखाचा आधार असल्याने त्याचे बलवान असणे अत्यंत आवश्यक आहे.
विवाहाशी संबंधित अडथळे दूर करण्यासाठी ज्योतिषीय उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. शनी दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी, शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि शनी मंत्राचा जप करा: "ॐ शं शनैश्चराय नमः।" मंगळ दोषाचा प्रभाव शांत करण्यासाठी, मंगळवारी भगवान हनुमानाला पवित्र वस्त्र अर्पण करा किंवा मंगळवारचा उपवास करा.
शुक्र ग्रहाला बलवान करण्यासाठी, शुक्रवारी पांढरे वस्त्र परिधान करा आणि गोड पदार्थ व पांढरी फुले अर्पण करा. स्त्रियांनी गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करावे आणि गुरु ग्रहाच्या मंत्राचा जप करावा. तसेच दर सोमवारी शिवलिंगावर दुग्धाभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. आपल्या जन्मपत्रिकेचे (कुंडलीचे) विश्लेषण करून घेण्यासाठी आणि सल्ला घेण्यासाठी एखाद्या तज्ज्ञ ज्योतिषाचा सल्ला घ्या. 'या' ४ पैकी एखादे स्वप्न पडले, तर चुकूनही कुणाला सांगू नका!