Cyber Fraud Case: 20 रुपयांच्या वीज बिलातून 1.99 लाखांचा सायबर फ्रॉड; ग्राहकाला दिलासा, SBIला पैसे परत करण्याचे आदेश

Cyber Fraud Case: 20 रुपयांच्या वीज बिलाच्या बहाण्याने झालेल्या सायबर फसवणुकीत ग्राहकाचे 1.99 लाख रुपये गेले. राष्ट्रीय ग्राहक आयोगाने SBI ला रक्कम परत देण्याचे आदेश दिले.
Cyber Fraud Case
Cyber Fraud CasePudhari
Published on
Updated on

Cyber Fraud Case: फक्त 20 रुपयांचे वीज बिल भरत असताना एका व्यक्तीची तब्बल 1.99 लाखांची सायबर फसवणूक झाली आहे. मात्र, या प्रकरणात राष्ट्रीय ग्राहक आयोगाने ग्राहकाच्या बाजूने महत्त्वाचा निर्णय देत स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) संपूर्ण रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत.

ग्राहक आयोगाचा निर्णय

राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने सांगितलं की, ग्राहकाने वेळेत फसवणुकीची माहिती दिल्यानंतर बँक जबाबदारी टाळू शकत नाही. याचबरोबर बँकेला 1.99 लाख परत देण्यासोबतच 25,000 रुपयांची नुकसानभरपाई देण्याचेही निर्देश देण्यात आले.

फसवणूक कशी झाली?

बंगळुरूतील एका व्यक्तीला वीज बिल थकबाकीबाबत बनावट SMS आला. त्यात दिलेल्या नंबरवर संपर्क साधल्यानंतर त्याला एक अॅप डाउनलोड करायला सांगितले गेले. नंतर 20 रुपयांचे बिल भरताना अचानक त्याच्या खात्यातून 25,000 रुपये आणि त्यानंतर 1.99 लाख डेबिट झाले.

ग्राहकाची पोलिसांकडे तक्रार

फसवणूक लक्षात येताच संबंधित व्यक्तीने लगेच सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार केली.
बँकेलाही हेल्पलाइन आणि ईमेलद्वारे माहिती दिली. बँकेने 25,000 रुपये परत केले, पण उर्वरित मोठी रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली.

SBIने काय स्पष्टीकरण दिले?

बँकेने दावा केला की ग्राहकाने OTP किंवा संवेदनशील माहिती शेअर केली असावी. मात्र आयोगाने स्पष्ट केलं की याचा कोणताही पुरावा नाही, फक्त अॅप डाउनलोड केल्याने ग्राहक निष्काळजी ठरत नाही.

RBIच्या नियमांचा आधार

आयोगाने RBI च्या 2017 च्या नियमांचा संदर्भ देत सांगितले की, जर ग्राहकाने 3 दिवसांत फसवणूक कळवली, तर त्याची ‘Zero Liability’ असते. म्हणजेच अशा परिस्थितीत संपूर्ण जबाबदारी बँकेची असते.

Cyber Fraud Case
Who Is LizLaz: विराट कोहलीच्या एका लाइकमुळे सोशल मीडियावर राडा; कोण आहे जर्मन इन्फ्लुएंसर लिजलाज?

आयोगाचा अंतिम आदेश

आयोगाने SBI ला आदेश दिला की 1.99 लाख परत करावे आणि 25,000 रुपयांची नुकसानभरपाई द्यावी. 4 आठवड्यांत रक्कम परत न केल्यास 8% व्याज द्यावे लागेल.

हा निर्णय महत्त्वाचा का आहे?

या निर्णयामुळे डिजिटल बँकिंगमधील ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बँका जबाबदारी झटकू शकत नाहीत आणि ग्राहकाने वेळेत तक्रार केल्यास त्याचे संरक्षण होते. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमध्ये हा निर्णय एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Cyber Fraud Case
Unemployment Rate: बेरोजगारी दर वाढला; शहरांमध्ये परिस्थिती गंभीर… भारताची अर्थव्यवस्था संकटात?

20 रुपयांच्या छोट्या व्यवहारातून सुरू झालेलं हे प्रकरण लाखो रुपयापर्यंत गेलं, पण योग्य वेळी तक्रार केल्यामुळे ग्राहकाला न्याय मिळाला. हा निर्णय प्रत्येक डिजिटल बँकिंग युजर्ससाठी सावधगिरीचा इशारा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news