निस्तेजता आणि आयुर्वेद
निस्तेजता, अकाली वार्धक्य यासारख्या समस्या हल्ली तरुण पिढीमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.
गुरुकुलपारंपरिक उपचार : सुवर्णमाक्षिकादि वटी, चंद्रप्रभा आणि शृंगभस्म प्रत्येकी तीन गोळ्या, सकाळी आणि सायंकाळी रिकाम्या पोटी 3 चमचे कृष्मांडपाकाबरोबर घ्याव्यात. भोजनोत्तर अश्वगंधारिष्ट घ्यावे. मधुमेह असल्यास कुमारी आसव किंवा फलत्रिकादि काढा 4/4 चमचे जेवणानंतर घ्यावा.
कृश व्यक्तीने रात्री अश्वगंधा चूर्ण एक चमचा घ्यावे. पोटात वायू धरत नसल्यास, शारीरिक श्रम जास्त असताना लाक्षदि गुग्गुळ, लाक्षादिघृत किंवा शतावरीघृत दोन वेळा घ्यावे. शुक्रक्षयामुळे निस्तेजता आली असल्यास अश्वगंधाघृत दोन चमचे, लक्ष्मीविलास 3 गोळ्या, मधुमालिनीवसंत 6 गोळ्या अशी औषधे दोन वेळा घ्यावी. फार खर्च परवडत नाही त्यांनी आस्कंद, वाकेरी, भुई कोहळा, चोपचिनी आणि शतावरी या औषधांचे एकत्रित चौगुण चूर्ण एक चमचा दोन वेळा घ्यावे.