Monsoon Health Tips | आयुर्वेद सांगते; शरीर डिटॉक्स पासून रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत कोमट पाणी ठरते गुणकारी

Monsoon Health Tips | कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक (टॉक्सिन्स) बाहेर पडतात, ज्यामुळे त्वचेवरील मुरुमांच्या समस्येपासून आराम मिळतो आणि त्वचा चमकदार व तजेलदार दिसू लागते.
Lukewarm Water drinking
Lukewarm Water drinkingCanva
Published on
Updated on

Lukewarm Water Health Benefits

कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक (टॉक्सिन्स) बाहेर पडतात, ज्यामुळे त्वचेवरील मुरुमांच्या समस्येपासून आराम मिळतो आणि त्वचा चमकदार व तजेलदार दिसू लागते.

Lukewarm Water drinking
Cancer | कर्करोगातून बरे झाल्यानंतर...

Drink Lukewarm Water in Monsoon:

पावसाळा सुरू होताच वातावरणात आर्द्रता आणि दमटपणा वाढतो. या ऋतूत विषाणू आणि जिवाणूंचीही झपाट्याने वाढ होते, ज्यामुळे अनेक आजार पसरतात. अशा परिस्थितीत कोमट पाणी पिण्याची सवय तुमच्या आरोग्यासाठी एक मोठी ढाल बनू शकते. "उष्णं जलं पचति आमं तेन रोगा न जायते" या श्लोकानुसार, गरम पाणी विषारी घटक पचवते, ज्यामुळे रोग होत नाहीत.

कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे

चरक संहितेनुसार, पावसाळ्यात शरीराची पचनशक्ती मंदावते. त्यामुळे आपण जे काही खातो, ते व्यवस्थित पचत नाही आणि शरीरात विषारी घटक तयार होऊ लागतात. शरीरात जमा झालेले हे विषारी घटक घाम आणि लघवीद्वारे बाहेर पडतात. यासोबतच, कोमट पाणी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते, ज्यामुळे सर्दी, खोकला आणि तापापासून आराम मिळतो.

दमट हवामानामुळे घशात खवखव, कफ आणि अनेक प्रकारचे संक्रमण होऊ शकते. अशावेळी कोमट पाणी प्यायल्याने या समस्यांपासून मोठा दिलासा मिळतो आणि संक्रमण दूर होण्यासही मदत होते. पावसाळ्यात आर्द्रतेमुळे शरीरात अनेकदा जडपणा जाणवतो. दररोज कोमट पाणी प्यायल्याने स्नायूंमधील ताण कमी होतो आणि आराम मिळतो.

Lukewarm Water drinking
Panchakarma Benefits | पंचकर्म म्हणजे नेमकं काय? कोणी आणि केव्हा करावे पंचकर्म? आयुर्वेदात काय सांगितलंय

कोमट पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात

आयुर्वेदानुसार, कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. यामुळे त्वचेवरील मुरुमांच्या समस्येपासून आराम मिळतो आणि त्वचा चमकदार व तजेलदार दिसू लागते.

सुश्रुत संहितेनुसार, सकाळी रिकाम्या पोटी, जेवणाच्या अर्धा तास आधी, जेवणानंतर अर्ध्या तासाने आणि रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यावे. जेव्हा तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिता, तेव्हा पचनसंस्था सक्रिय होते आणि शौचास साफ होते. तर, जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. जेवणानंतर अर्ध्या तासाने दोन-तीन ग्लास पाणी प्यायल्यास अन्न सहज पचते आणि रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने झोप चांगली लागते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news