सशक्त, महान राज्यघटनेच्या पाठबळावरच राज्याच्या विकासाची वाटचाल : उद्धव ठाकरे

सशक्त, महान राज्यघटनेच्या पाठबळावरच राज्याच्या विकासाची वाटचाल : उद्धव ठाकरे
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्‍तसेवा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सशक्त, महान अशा राज्यघटनेच्या पाठबळावरच आपल्या राज्याची विकासाची वाटचाल सुरु आहे. अशी कृतज्ञता व्यक्त करत  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुभेच्छा संदेशात म्‍हणाले, डॅा. आंबेडकर यांनी आपल्याला जगातील सर्वोत्तम अशी राज्यघटना दिली आहे.

या सशक्त राज्यघटनेच्या माध्यमातूनच आपण प्रजासत्ताक आणि बलशाली राष्ट्र म्हणून वाटचाल करत आहोत. विविधतेने नटलेल्या आपल्या देशाला राज्यघटनेच्या एका सुत्रात गुंफून एकसंघ ठेवण्याची किमया डॉ. बाबासाहेबांनी केली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना डॉ. आंबेडकर यांच्या या योगदानासाठी आपल्याला कृतज्ञच राहावे लागेल.

बाबासाहेबांनी घालून दिलेल्या आदेशानुसार आपल्याला राज्य आणि देशाबद्दलची बांधिलकी जपावी लगेल. तसेच डॉ. आंबेडकर यांच्या समता-बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता या सुत्रांविषयी जागरूक राहावे लागेल, हेच जयंती दिनी विनम्र अभिवादन आणि या जयंती दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा असे उद्धव ठाकरे म्‍हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news