बेळगाव : आजपासून शाळा नियमित

 शाळा
शाळा

बेळगाव;  पुढारी वृत्तसेवा :  अतिवृष्टीमुळे शुक्रवार व शनिवार दोन दिवस शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्याला जोडून रविवार आल्याने तीन दिवस विद्यार्थ्यांना सुट्टी मिळाली. आता सोमवारपासून शाळा सुरू होणार आहेत.
गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने संततधार हजेरी लावली. त्यामुळे नदी, नाले प्रवाहित झाल्याने रहदारीची संपर्क यंत्रणा कोलमडली. खानापूर तालुक्यात तर 35 गावांचा संपर्क तुटला.

हालात्री नदीवर पाणी आल्याने हेम्माडगा गोवा मार्ग बंद ठेवण्यात आला. पावसाचा जोर वाढल्याने शाळांना शुक्रवारी सकाळी सुट्टी जाहीर करण्यात आली. शनिवारपासून पावसाचा जोर कमी झाला असून, सोमवारपासून शाळा नियमित सुरू होणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news