बेळगाव : दूषित पाण्यामुळे 40 जण अत्यवस्थ | पुढारी

बेळगाव : दूषित पाण्यामुळे 40 जण अत्यवस्थ

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  दूषित पाण्यामुळे बेन्नूर (ता. रामदुर्ग) येथे 40 जण अत्यवस्थ झाले. त्यांच्यावर रामदुर्ग येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

होसकेरी ग्राम पंचायत व्याप्तीत येणार्‍या बेन्नूर गावामध्ये दूषित पाणी पिल्याने नागरिकांना उलटी, जुलाब लागला. यापैकी 40 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यापैकी 13 जणांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. रामदुर्ग येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पाणी पुरवठ्यासाठी घालण्यात आलेल्या पाईपलाईनच्या व्हाल्व्हमध्ये गटारीचे पाणी मिसळल्याने हा परिणाम झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच आरोग्य अधिकारी व ताशिलदार मल्लिकार्जुन हेग्गण्णावर यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली. प्राथमिक केंद्राच्या कर्मचार्‍यांकडून घरोघरी भेट देऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

Back to top button