

राजापूर, पुढारी वृत्तसेवा : रिफायनरी विरोधात बारसूमध्ये सुरु असलेले आंदोलन 3 दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. स्थानिक नेत्यांनी याची आज (दि.२८) घोषणा केली आहे. याचबरोबर जर तीन दिवसांत माती परीक्षण थांबले नाही, तर पुन्हा आंदोलन पुकारण्याची घोषणा करण्यात आली आहे.
बारसूमध्ये कोणावरही लाठीचार्ज केलेला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काही स्थानिक तर काही बाहेरून आलेले लोक आहेत, असेही ते म्हणाले. या दरम्यान बारसूमध्ये आंदोलकांशी बोलण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आले होते. त्यांनी आंदोलकांना चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांकडून ठोस काही घोषणा होत नसल्याने आंदोलक त्यांच्यासमोरून निघून गेले. राजापूरमध्ये देखील दोन तास संवाद साधला होता. प्रशासन तुमच्या सोबत आहे, समस्यांवर मार्ग निघू शकतील. प्रतिनिधींची नावे द्या, आम्ही त्यांच्यासोबत संवाद साधू असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी बोलणे थांबविले.
माती परीक्षण तीन दिवसांत थांबवा. तीन दिवसांत माती परीक्षण थांबले नाही. तर पुन्हा आंदोलन सुरु होईल. तीन दिवसांत पुन्हा चर्चा झाली नाही, तर पुन्हा आंदोलन करणार, असे स्थानिक नेते काशिनाथ गोरले यांनी सांगितले.
हेही वाचा