जळगावला अवकाळीचा तडाखा, शेती पिकांचे नुकसान

जळगावला अवकाळीचा तडाखा, शेती पिकांचे नुकसान
Published on
Updated on

जळगाव – जिल्ह्यात (दि. 9) व (दि. 11) रोजी झालेल्या अवकाळीने 3984 हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे  शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.  अवकाळी पाऊस व वाऱ्याने 157 गावातील 7372 शेतकऱ्यांचे 3984 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले. तसेच आज (दि.) 12 5 वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली.

हवामान खात्याने लावलेल्या अंदाजानुसार आज तिसऱ्या दिवशी दुपारी पाच वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. जळगाव येथे 15 ते 20 मिनिटं जोरदार पाऊस चालला. तर भुसावळ येथे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडासह पावसाने हजेरी लावली.

दुसरीकडे जळगाव जिल्ह्याचे तापमान सध्याला 40 ते 42 अंशावर गेलेले आहे. अशातच पुन्हा जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. यात 157 गावातील 7372 शेतकऱ्यांचे व नागरिकांच्या व व्यापारी वर्गाचे नुकसान झालेले आहे.
यामध्ये दि. 9 रोजी झालेल्या अवकाळी पावसाने जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर या भागात मोठ्या प्रमाणात शेती पिकांची नुकसान झाले. यामध्ये जामनेर 53, बोदवड 32, मुक्ताईनगर 38 अशा 123 गावांमधील सहा हजार पाचशे सहा शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news