रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा: रत्नागिरी शहरालगत असलेल्या टेंभ्ये बौद्धवाडी येथील महिलेचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. आशा प्रदीप पवार (५५) असे त्यांचे नाव आहे. या दुर्घटनेने रत्नागिरी परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.
अधिक वाचा
आज सकाळी सात वाजता आशा पवार या कोविड लसीचा डोस घेण्यासाठी चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात जात होत्या. सकाळी त्या तेथे जाण्यासाठी निघाल्या असता आडकरवाडी येथील पावाचा पर्याला पुराचे पाणी आल्याने तो तुडुंब वहात होता.
अधिक वाचा
तो पर्या पार करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने आशा पवार यांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.
आशा पवार यांच्या पश्चात पती, मुलगा, २ मुली असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचलं का?