नवी दिल्ली : आपल्याला हिमवृष्टीचा आनंद लुटता येत नाही. मात्र, आकाशातून (sky) गारांच्या (hail) रूपात बर्फ पडण्याची घटना आपण पाहू शकतो. अशी गारपीट लहान मुलांना आनंद देत असली तरी शेतीसाठी ती नुकसानदायकच असते. अनेक वेळा मोठ्या आकाराच्या गारांमुळे लोक जखमी होण्याचेही प्रकार घडलेले आहेत. या गारा आकाशात कशा बनतात हे ठावूक आहे का?
Hail : नद्या आणि समुद्राचे पाणी सूर्यप्रकाशाच्या उष्णतेने वाफेत रूपांतरीत होऊन आकाशात (sky) जाते. याच वाफेचे ढग बनतात. ज्यावेळी हे ढग सघन होऊ लागतात त्यावेळी त्यांच्यामधून पाणी पडू लागते व त्यालाच आपण पाऊस म्हणतो. पाऊस हा बर्याच अंशी हवेची गती, दाब आणि तापमानावर अवलंबून असतो. समुद्रसपाटीपासून जसे जसे उंचीवर जाऊ तसे तापमान कमी होऊ लागते.
आकाशात काही टप्प्यांवर तापमान शून्याखालीही घसरते. त्यावेळी तेथील हवेतील आर्द्रता पाण्याच्या छोट्या थेंबात रूपांतरीत होऊन ती गोठू लागते. हे बर्फाचे तुकडे एकत्र येऊन त्यांचे गोळे बनू लागतात. त्यांचे वजन वाढले की ते पृथ्वीवर कोसळू लागतात. खाली येत असताना उष्ण हवेशी संपर्क आल्याने ते वितळूही लागतात. अशा बर्फाच्या तुकड्यांनाच आपण 'गारा' (Hail) म्हणतो. या गारा शेतीशिवाय विमान, ऑटोमोबाईल, काचेचे छत, खिडक्यांची तावदाने आदींसाठीही नुकसानकारक असतात.
.हेही वाचा