Latest

T-20 मध्ये नवा टीम इंडियाचा नवा कॅप्टन कोण ? विराट कोहलीने थेट नाव सांगितले !

backup backup

T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया आज (ता.०८) नामिबियाविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळत आहे. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा टी-२० फॉरमॅटमधील शेवटचा सामना आहे, त्यामुळे हा एक अतिशय खास क्षण असेल. टॉसवेळी बोलताना विराट कोहली म्हणाला की, भारतीय संघाचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाचा नवा कर्णधार कोण होऊ शकतो, याचे संकेत विराट कोहलीने दिले आहेत.

विराट कोहली म्हणाला की, माझ्यावर दिलेली जबाबदारी पार पाडण्याचे काम मी केले आणि ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. भविष्यासाठी जागा तयार करण्याची हीच वेळ आहे. टीम इंडियाने केलेल्या कामगिरीचा अभिमान आहे.

आता वेळ आली आहे की, संघाला पुढे नेण्याची जबाबदारी पुढील गटाची आहे. रोहित शर्माही इथेच आहे, तो काही काळापासून सर्व काही पाहत आहे. तसेच संघात अनेक लीडर्स आहेत, त्यामुळे येणारा काळ भारतीय क्रिकेटसाठी चांगला आहे.

या स्पर्धेनंतरच बीसीसीआय टी-20 फॉरमॅटच्या नव्या कर्णधाराची घोषणा करू शकते, असे मानले जात आहे. या शर्यतीत रोहित शर्माचे नाव आघाडीवर आहे. विराट कोहलीचे एकदिवसीय कर्णधारपदही जाऊ शकते, त्यामुळे व्हाईट चेंडू फॉरमॅटसाठी एक कर्णधार असेल आणि कसोटी फॉरमॅटसाठी विराट कोहली कर्णधार असेल, असे वृत्त आहे.

वर्ल्डकप अगोदर केली घोषणा

टी-20 विश्वचषकापूर्वी विराट कोहलीने या फॉरमॅटमध्ये कर्णधार नसल्याची घोषणा केली होती. आता भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकलेला नाही, तर नामिबियाविरुद्धचा शेवटचा सामना आहे. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा 50 वा टी-20 सामना आहे.

विराट कोहलीशिवाय प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांचाही हा शेवटचा सामना आहे. T20 विश्वचषकानंतर माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारणार आहे.

हे ही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT