लासलगाव(जि. नाशिक) वृत्तसेवा ; केंद्र सरकारच्या निर्यातबंदीचा फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. निर्यात बंदी नंतर कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. यामुळे शेतकरी संतापला असून याचा भडका आज सोमवारी (दि. २९) लासलगाव बाजार समितीत पाहायला मिळाला. कांदा निर्यात बंदी उठवावी, कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावे या मागण्यांसाठी महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे आणि शेतकरी यांनी आक्रमक होत मागणी केली. (Onion News)
कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी करत आज लासलगाव बाजार समितीत शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडला. यावेळी शेतक-यांनी केंद्र सरकराचा निषेध नाेंदवला. कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याची भावना शेतक-यांनी व्यक्त केली.
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यानंतर देशासह महाराष्ट्रात कांद्याचे दर सातत्याने कोसळू लागले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी कांद्याचा सरासरी दर कमी होऊन तो एक हजार रुपयांवर आला आहे.
केंद्र सरकारने निर्यातबंदी त्वरित उठवावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद पाडला. शेतकरी संघटनेने केंद्र सरकारचा निषेध नाेंदविला. सरकारने निर्यातबंदी न उठवल्यास ठिकठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
हेही वाचा :