T20 विश्वचषक जिंकल्यानंतर PM मोदींचा भारतीय संघाशी फोनवरून संवाद  File Photo
स्पोर्ट्स

T20 World Cup|T20 विश्वचषक जिंकल्यानंतर PM मोदींचा भारतीय संघाशी फोनवरून संवाद

हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादवचेही पंतप्रधानांकडून कौतुक

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.३०जून) भारतीय क्रिकेट संघाशी फोनवर संवाद साधला. यावेळी भारतीय संघातील खेळाडूंशी त्यांनी T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण संघाचे अभिनंदन केले. रोहित शर्माच्या शानदार कर्णधारपदासाठी त्यांनी अभिनंदन केले आणि त्याच्या टी-20 कारकिर्दीचेही कौतुक केले. विराट कोहलीच्या अंतिम सामन्यातील खेळी तसेच भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल मोदींनी विराटचेही कौतुक केले.

पीएम मोदींनी हार्दिक पंड्याचे त्याच्या शेवटच्या षटकासाठी आणि सूर्यकुमार यादवचे त्याच्या झेलबद्दल कौतुक केले. त्याने जसप्रीत बुमराहच्या योगदानाबद्दलही जोरदार चर्चा केली. भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल पंतप्रधानांनी राहुल द्रविडचे आभारही मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT