आयपीएल स्‍पर्धेत सलग पाच पराभवामुळे पंजाबच्‍या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.  Pudhari
स्पोर्ट्स

sunil gavaskar on shreyas iyer | "श्रेयसने खेळपट्टीवर.." : पंजाब किंग्सच्‍या सलग ५ पराभवांनंतर सुनील गावस्करांनी सुनावले

'प्ले ऑफ'मध्‍ये धडक मारण्‍यासाठी पंजाबला उर्वरित दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य

पुढारी वृत्तसेवा

sunil gavaskar on shreyas iyer

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या हंगामात पंजाब किंग्सला (PBKS) सलग पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे त्यांच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. गुणतालिकेत अजूनही चौथ्या स्थानावर असलेल्या पंजाबला पुढील फेरीत जाण्यासाठी आता त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे. गुरुवारी पंजाबविरुद्धच्‍या सामन्यात मुंबईने २०१ धावांचे लक्ष्य सहज गाठल्याचे पाहून भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्करही चकीत झाले.

श्रेयसने खेळपट्टीवर जास्त वेळ टिकणे आवश्‍यक होते

आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या गावस्करांनी कबूल केले की, धरमशाला येथे पंजाबविरुद्ध शेवटच्या तीन षटकांत मुंबईने ५३ धावा कशा केल्या, गावस्कर म्हणाले की, श्रेयस जर खेळपट्टीवर जास्त वेळ टिकला असता, तर संघाने आणखी २०-३० धावा केल्या असत्या. एवढेच नाही तर, गोलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर बार्टलेटला नवीन चेंडू न देण्याच्या अय्यरच्या निर्णयावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पंजाबसाठी गोलंदाजी चिंतेचा विषय

"हा सामना पंजाब किंग्सने जिंकायला हवा होता, विशेषतः शेवटच्या तीन षटकांत ५३ धावा कुटून २०० चा टप्पा पार केल्यानंतर. त्या क्षणी त्यांच्याकडे गती होती आणि सामना त्यांच्या नियंत्रणात दिसत होता. पण त्यांची गोलंदाजी अजूनही चिंतेचा विषय आहे. श्रेयस अय्यरच्या अपयशाचाही संघाला फटका बसला, कारण जेव्हा तो धावा करतो, तेव्हा पंजाबला सहसा आणखी २०-३० धावा मिळतात, ज्यामुळे सामन्यात फरक पडू शकला असता. बार्टलेट महागडा ठरला आहे, आणि खेळपट्टी अनुकूल असतानाही त्याला नवीन चेंडू का दिला गेला नाही, याचे मला आश्चर्य वाटले," गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले.

संजय बांगर यांनीही गावस्‍करांच्‍या सुरात मिळवला सूर

भारताचे माजी फलंदाज संजय बांगर यांनीही गावस्करांच्या सुरात सूर मिळवला. मुंबईविरुद्ध केवळ पाच गोलंदाजांचा वापर करण्याचा अय्यरचा निर्णय सामन्याला कलाटणी देणारा ठरला, याकडे त्यांनी लक्ष वेधले.श्रेयस अय्यरने या सामन्यात फक्त पाच गोलंदाजांचा वापर केला, आणि फलंदाज बार्टलेटला लक्ष्य करणारच होते. तोपर्यंत चहल आणि अर्शदीप यांनी अत्यंत चांगली गोलंदाजी केली होती. एक प्रकारे, पंजाब किंग्सने स्वतःच स्वतःचा फायदा गमावला. रोहित शर्मा आणि रुदरफोर्ड यांच्या खेळी एकत्र करून पाहिली, तर त्यांनी ४७ चेंडूत केवळ ४५ धावा केल्या होत्या," असे बांगर म्हणाले.

तिलक वर्माचे कौतुक

बांगर यांनी मुंबईच्या तिलक वर्माचे विशेष कौतुक केले, ज्याने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि शेवटच्या १२ षटकांत संघाला जवळपास १५० धावा करून देण्यात मुख्य भूमिका बजावली. मुंबई इंडियन्सला उर्वरित १२ षटकांत सुमारे १५० धावांची गरज होती. त्यामुळे इतर फलंदाजांचा स्ट्राईक-रेट कमी असतानाही मुंबई इंडियन्सला शर्यतीत टिकवून ठेवण्यासाठी टिळक वर्माने केलेले प्रयत्न अप्रतिम होते. एकंदरीत, हा एका रोमहर्षक सामन्याचा नेत्रदीपक शेवट होता," ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT