Sunil Gavaskar on India's spinners
नवी दिल्ली : भारतातील फिरकीपटू हे जगातील सर्वोत्तम गोलांदाजांपैकी एक नाहीत. बहुतेक पाश्चात्य संघातील फिरकीपटू आता भारतापेक्षा चांगले आहेत, असे विधान माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) केले होते. आता या विधानाचे समर्थन करत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी केले आहे. तसेच भारतीय फिरकीपटूंची कामगिरी का खालावली, याचे कारणही त्यांनी सांगितले आहे.
दक्षिण आफ्रिका संघाविरोधातील पहिला कसोटी सामना नुकताच कोलकात्ता येते झाला. या सामन्यात सुरुवातीपासून भारताची पकड होती. मात्र दुसर्या डावात भारतीय फिरकीपटूंसह फलंदाजांनीही हाराकिरी केली. दक्षिण आफ्रिका संघाने सामना जिंकला. वास्तविक कोलकाता येथील खेळपट्टी ही भारतीय फिरकीपटूंसाठी अनुकूल होती. मात्र बाजी मारली दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूंनी. त्यामुळे अनेक माजी क्रिकेटपटूंनी टीम इंडियाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत आर. अश्विन म्हणाला होता की, आधुनिक भारतीय फलंदाजांना फिरकी गोलंदाजीपेक्षा जागतिक दर्जाच्या वेगवान गोलंदाजी हाताळण्याची सवय लागल्याचे दिसते. आमच्याकडे सध्या जगातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटू नाहीत. बहुतेक पाश्चात्य संघ आता भारतापेक्षा चांगले आहेत. कारण ते भारतात येतात. जास्त सराव करतात; परंतु आम्ही त्याचा पुरेसा सराव करत नाही. आम्ही सध्या इतर अनेक ठिकाणी वेगवान गोलंदाजीचे श्रेष्ठ खेळाडू आहोत. आम्ही ते एक आव्हान मानतो, परंतु हे नाही. हाच फरक आहे,"
रविचंद्रन अश्विनच्या परखड मताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी समर्थन केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, सर्वच खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्याची गरज आहे. भारतीय खेळाडूंना विश्रांती असतानाही रणजी ट्रॉफी खेळण्यास कसे टाळाटाळ करतात, असा सवाल करत त्यांच्याकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या टर्निंग पिचवर उत्कृष्टतेची अपेक्षा करणे खूप जास्त होईल.
"आपले बरेच खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळत नाहीत. तुम्ही देशांतर्गत क्रिकेट खेळलात तर तुम्हाला अशाखेळपट्टीवर खेळायला मिळेल, बरोबर? कारण देशांतर्गत स्तरावरही संघ गुण मिळविण्याचा प्रयत्न करत असतात जेणेकरून ते रणजी ट्रॉफीच्या बाद फेरीसाठी पात्र ठरतील; पण आमचे कोणतेही खेळाडू देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळत नाहीत. टीम इंडियात सध्या असणारे किती खेळाडू रणजी ट्रॉफी खेळण्यास खरोखर पात्र आहेत?, असा सवालही त्यांनी केला.
यावेळी गावस्करांन काही खेळाडूंवर पडणार्या 'वर्कलोड मॅनेजमेंट'वरही जोरदार टीकाकार आहेत.खेळाडूने देशासाठी सर्व सामने खेळण्यास तयार असले पाहिजे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे रणजी ट्रॉफीचे सामने न खेळणे हे महान फलंदाजांचे समर्थन नाही, असे स्पष्ट करत आपले खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत नाहीत कारण वर्कलोड नावाचा एक शब्द आहे. वर्कलोड हा शब्द आहे. त्यांना खेळायचे नाही. ते खेळू इच्छित नाहीत. ते फॉर्ममध्ये नसतील तरच त्यांना रणजी ट्रॉफीमध्ये खेळायचे आहे. ते खेळू इच्छित नाहीत. तर हेच उत्तर आहे. कदाचित तुम्हाला अशी खेळपट्टी तयार करायची आहे जिथे चेंडू पकडेल आणि थोडा वळेल; मग तुम्हाला स्थानिक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना निवडायचे आहे.खरोखर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना खेळवायचे नाही कारण त्यांच्याकडे अशा प्रकारच्या खेळाडूंविरुद्ध सराव नाही," असेही गावसकरांनी स्पष्ट केले.