मनोरंजन

तुला शिकवीन चांगलाच धडा : अक्षरासमोर आलं भुवनेश्वरीच सत्य!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठीची चर्चित मालिका 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत रोज नवीन ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळताहेत. अक्षरा आणि भुवनेश्वरी मधील नातं एक वेगळं वळण घेताना दिसणार आहे. अक्षराने पुन्हा शाळेत जायला सुरुवात केली आहे, हे भुवनेश्वरीला बिलकूल आवडलेलं नाही. अक्षराच्या शाळेच्या पहिल्या दिवशीच भुवनेश्वरी फुलपगारे सरांना फोन करुन सांगते की, अक्षराला जर शाळेत घेतलंत तर तुमचा तो शाळेत शेवटचा दिवस असेल. अक्षरा भुवनेश्वरीचा हा डाव तिच्यावरच उलटवणार का? फुलपगारेसरांची नोकरी वाचणार का?

संबंधित बातम्या – 

भुवनेश्वरीला सतत होणारी तिची हार आता सहन होत नाहीये. तेव्हा ती अक्षराच्या बहिणीला म्हणजेच इराला आपल्या सोबत घेतेय. त्य़ाचबरोबर भुवनेश्वरी, चारुहासने जो भूतकाळ उलगडला, त्यामध्ये तिची काय बाजू आहे, हे स्वत:हून अक्षरासमोर व्यक्त करते. आता भुवनेश्वरीच हे सत्य खरं आहे की कोणतं नवीन नाटक? हे येणाऱ्या भागातच कळेल. 'तुला शिकवीन चांगलाच धडा' सोमवार ते शनिवार रात्री ८ वा. पाहता येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT