पुढारी ऑनलाईन डेस्क : सिनेसृष्टीतील प्रसिद्ध स्टार कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या (Ranbir Alia Wed) लग्नाची सतत चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही कलाकारांच्या लग्नाबाबत अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. दरम्यान, नुकतीच रणबीर-आलियाच्या लग्नाची एक मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर-आलियाचे लग्न (Ranbir Alia Wed) पुढे ढकलण्यात आले आहे.
याबाबत अभिनेत्री आलियाचा भाऊ राहुल भट्ट याने याबाबत माहिती दिली. एका वेबसाईटशी झालेल्या संवादात अभिनेत्रीच्या सावत्र भावाने सांगितले की, लग्नाची सर्व तयारी झाल्यानंतरही लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. याआधी आलियाचे काका रॉबिन यांनी १४ एप्रिलला लग्न होणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता ते तूर्तास पुढे ढकलण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मंगळवारी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत राहुलने याबाबत स्पष्ट माहिती दिली.
राहुलने सांगितले की, आता १४ एप्रिलला लग्न होणार नाही आणि १३ एप्रिललाही कोणता सोहळा नाही. कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीनुसार, लग्न जवळपास आठवडाभर पुढे ढकलले जात आहे. मात्र, अद्याप कोणतीही अंतिम तारीख निश्चित झालेली नाही. मीडियामध्ये तारखा लीक झाल्यानंतर लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे राहुलने सांगितले. ते म्हणाले, "लग्न होत आहे, हे सर्वांना माहीत आहे. पण १३ किंवा १४ एप्रिलला लग्न नाही. हे नक्की आहे.
दरम्यान, याबाबत अभिनेता आलिया भट्टचे वडील महेश भट्ट यांना विचारले असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला. एका मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा त्याला लग्नाच्या तारखांबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, "मला रणबीर कपूरची आई अभिनेत्री नीतू कपूर यांनी याबद्दल जाहीरपणे बोलू नका असे सांगितले होते. त्यामुळे मी तिला विनंती करतो. मी त्याकडे दुर्लक्ष कसे करू शकतो?"