Heeramandi 2  
मनोरंजन

Heeramandi 2 मध्ये स्वातंत्र्यानंतरच्या तवायफची कहाणी! ‘नेटफ्लिक्स’ची घोषणा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : संजय लीला भन्साळींची सीरीज 'हिरामंडी'ची चर्चा होत असताना आता नेटफ्लिक्सने दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. या सीरीजला समीक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळल्या आहेत. आता सीझन २ मध्ये स्वातंत्र्यानंतरच्या तवायफची कहाणी पाहायला मिळणार आहे.

हिरामंडीचा पूर्ण सीजन संपुष्टात येताच जिथे आलमजेब प्रेगेनेंट असल्याचे वृत्त ताजदारची आजी सांगते. बिब्बोजान इंग्रजांशी लढताना मरण पावते. आणि ताजदारचे लग्न आलमजेबशी होऊ नये म्हणून त्याचे वडील त्याला पोलिसांच्या हवाली करतो. ताजदार देखील इंग्रजांच्या मारहाणी पोलिसांच्या ताब्यात असतानाच मरण पावतो.

अधिक वाचा-

हा सर्व घटनाक्रम लाहौरचा आहे. सीरीजच्या आधी सीझनचा अंत होतो. स्वातंत्र्याचा संघर्ष सुरु आहे. कथा आता लाहौरमधून निघून कुठे जाईल, हे पाहणं उत्सुकतचं ठरेल. संजय लीला भन्साळी सीजन २ दिल्ली आणि मुंबईतील कोठींमदील तवायफवर लक्ष देऊन अभ्यास करतील, अशे म्हटले जात आहे.

अधिक वाचा-

संजय लीला भन्साळींनी हिरामंडी : डायमंड बाजारच्या यशासाठी आभार व्यक्त केले. ते म्हणाले, "हिरामंडी: द डायमंड बाजारासाठी प्रेम आणि कौतुक मिळाले, मी आभार मानतो. या सीरीजमध्ये जगभरातील प्रेक्षकांसोबत आम्ही जोडलो, ही आनंदाची गोष्ट आहे आणि मी नेटफ्लिक्सपेक्षा उत्तम दुसऱ्या पार्टनरची अपेक्षा करू शकत नाही. मला ही घोषणा करताना आनंद होत आहे की, आम्ही सीजन २ सोबत परत येऊ!"

अधिक वाचा-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT