पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रेयस तळपदेचा आगामी चित्रपट कर्तम भुगतमची चर्चा होत असताना त्याने एका मुलाखतीत नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिलीय. निवडणुकीच्या वलयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेऊन मनातील भावना व्यक्त केल्या. सध्या राजकीय परिस्थितीत मोदी निवडून येण्यासारखे वातावरण असल्याचे त्याने मुलाखतीत म्हटले आहे. विचारलेल्या प्रश्नावर श्रेयसने उत्तम उत्तर दिल्याने त्याची चर्चा होताना दिसतेय.
श्रेयस तळपदेने मुलाखतीत सांगितले की, "सध्या देशातील राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येतील, अशी चिन्हे आहेत. त्यांचं मला विशेष कौतुक आहे. गेली १० वर्ष मोदीजी देशात विकासकामे करत आहेत. ते आधी देशाचा विचार करतात. अटलबिहारी वाजपेयी सुद्धा असेच होते. जनतेचा कौल नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. त्यामुळे सध्याचं वातावरण पाहता नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येतील."
सोहम शाह यांनी सांगितले की, चित्रपटाची कथाखूप वर्ष आधीपासून विचारात होती, मी जेव्हा चित्रपट काल बनवला होता. तेव्हापासून माझी चित्रपटाची दृष्टी वेगळी होती. कोरोना काळात मी जेव्हा चित्रपट निर्मितीचे पद्धत आणि कथेबद्दल प्रेक्षकांची आवड पाहिलू आणि मी दृष्टीकोन बदलला. दिड- दोन वर्षांमध्ये मी पुन्हा स्क्रिप्ट लिहिली आणि फायनल ड्राफ्ट तयार केला. कर्तम भुगतम शीर्षक माझ्या मनी पहिल्या दिवसापासून होता. पण, या गोष्टीवरून निश्चित नव्हतो की, काय माहिती की या चित्रपटाबद्दल निर्माता आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय असतील?
अभिनेता विजय राज यांना वेगळ्या ओळखीची गरज नाही. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला आङे. काही विनोदात्मक अभिनयातही त्यांचा हातखंडा आहे. मर्डर इन माहिमुळे ते चर्चेत असून त्याच चित्रपटातील कलाकार, प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांनी त्यांचे कौतुक केले आहे. विजय राज हे शानदार आणि कसदार अभिनय करणारे अभिनेते असा उल्लेख आशुतोष यांनी केला.
हेदेखील वाचा –