Ketaki Chitale Instagram
मनोरंजन

आश्रम उघडला आहे? शेख हसीना यांना आश्रय देण्यावरून Ketaki Chitale ची नाराजी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगला देशात अजूनही हिंसाचाराचे युग सुरू आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडल्यानंतरही आंदोलक रस्त्यावरच आहेत. आता अभिनेत्री केतकी चितळे हिने इन्स्टा स्टोरी पोस्ट करून नाराजी व्यक्त केली आहे. केतकी नेहमीचं तिच्या वाधानांमुळे चर्चेत राहते. केतकीने सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीचं परखड मत मांडले आहे. आता बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या हिंसक आंदोलनाबाबत तिने मत व्यक्त केले आहे. बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भारतात आश्रयाला आल्या आहेत. शेख हसीना यांना केंद्र सरकारने दिलेल्या आश्रयाबाबत नाराजी व्यक्त केली.

काय म्हणाली केतकी चितळे?

१. लंडनने आश्रय देण्यास नकार दिला, शेख हसीना इथेच येतात.

२.म्यानमार मधील रोहिंग्यांना ५२ मुस्लिम देश दिसत नाहीत, मेले इथेच येतात कडमडायला.

३. बांग्लादेशींना पाकिस्तान इतका जवळचा वाटतो तिथे जात नाहीत. आठवडा बाजारात चायला रजई १०० रुपये टाकाने विकणार इथेच

जवळपास आपण धर्मशाळा, ओह सॉरी धर्म नाही कारण धर्म म्हंटले कि, हे सो-कॉल्ड भारतीय 'सो कॉल्ड अल्पसंख्याक मुसलमान' समाज जो बिचारा भीतीच्या छत्रछायेखाली असतो नाही का; त्यामुळे धर्म नाही. आश्रम उघडला आहे का आपण ?...अशी पोस्ट तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT