Elephant Sanctuary in India
शशिकांत सावंत
जंगलामधील प्राणी जीवनामध्ये हत्तींचे महत्व हे अनन्यसाधारण आहे. सध्या दंडकाअरण्यातून कोकणच्या सह्याद्री पर्वतांमध्ये दाखल झालेले हत्ती यामुळे मानव विरुद्ध हत्ती संघर्ष उभा राहिला आहे. या संघर्षाचे मूळ कारण हे हत्तींकडून बागायतींचे होणारे मोठे नुकसान हा कळीचा मुद्दा आहे.
नारळी पोफळीच्या बागा हत्ती उद्ध्वस्त करत असल्याने हत्तींचा बंदोबस्त करावा यासाठी शेतकरी आक्रमक आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या सीमारेषेवरील जंगलांमध्ये अलीकडच्या 25 वर्षात हत्तींचा मोठा अधिवास पाहायला मिळतो. भारतातील पानगळीच्या जंगलात आशियाई हत्तींचा वावर आहे.
25 वर्षांपूर्वी सुरुवातीला जेव्हा हत्ती दाखल झाले तेव्हा गणपतीचा अवतार आला म्हणून सर्वांनीच हत्तीचे स्वागत केले होते. मात्र, हत्तींचा उपद्रव वाढला आणि संघर्षाची ठिणगी पडली. त्या काळात हत्ती हटाव मोहिमाही राबविण्यात आल्या. काही हत्तींना पकडण्याचे प्रयत्न झाले. यात काही हत्तींचा मृत्यू झाला. काही हत्ती गोळीबारात मारले गेले. पण हत्तींचे कळप या भागात येतच राहिले. तिल्लारीचे विशाल जलाशय, मुबलक हिरवा चारा यामुळे हत्ती या भागात आकर्षिले गेले. नारळी पोफळीची झाडे उद्ध्वस्त करू लागले. मात्र यावर उपाय काय, असा प्रश्न सतावू लागतो. असाच संघर्ष श्रीलंकेतही सुरू झाला होता. त्यावेळी हत्तीच्या अधिवासाची कल्पना पुढे आली. भारतातही असे प्रयत्न होऊ शकतात.
गेल्या काही वर्षांपासून हत्तींच्या संवर्धनाची गरज तीव्रतेने जाणवत आहे. मानव-हत्ती संघर्ष, शिकार, प्राण्यांच्या प्रदेशांवर मानवी वस्त्यांचे अतिक्रमण यामुळे हा संघर्ष तीव्र झाला आहे.
भारतातही काही भागात हत्ती अभयारण्ये तयार करणे शक्य आहे. याच धर्तीवर पश्चिम घाटात अभयारण्य उभे करणे शक्य झाले. हे हत्ती अभयारण्य, 2001 मध्ये झारखंडमध्ये स्थापन झाले. अशाच स्वरूपात आता व्याघ्र आणि हत्ती अभयारण्य उभे करण्याची योजना आखली होती. मात्र सध्या तरी हा मुद्दा कागदावरच आहे.
भारतात ओरिसामध्येही वन्यजीव संवर्धनासाठी प्रयत्न झाले मयूरभंज हत्ती अभयारण्य हे यातीलच एक उदाहरण आहे. मयूरभंज हत्ती राखीव म्हणून ओळखले जाणारे सिमिलीपाल-कुलदीहा-हदगढ हत्ती राखीव हे ओरिसातील एक सुंदर क्षेत्र आहे. मेघालयातही गारो-टेकड्या हत्ती अभयारण्यही उभे करण्याचे प्रयत्न झाले. मेघालयाच्या जंगली भागात अनेक हत्ती कॉरिडॉर देखील आहेत. केरळमध्येही अनामुडी हत्ती अभयारण्य अस्तित्वात आहे. भारतातील हत्तीस्रोत अनामुडी हत्ती अभयारण्य हा एक डोंगराळ जंगली प्रदेश आहे जिथे इतर प्रजातींसह असंख्य हत्ती राहतात. येथे हिरवळीच्या परिसरात निरोगी हत्ती मुक्तपणे फिरताना दिसतात. या परिसरात 275 हून अधिक विविध प्रजातींच्या वनस्पती असल्याने, कोणत्याही निसर्गप्रेमीसाठी हे एक सुंदर ठिकाण आहे. वाघ, बिबट्या, पँथर, बायसन, नीलगिरी तहर, हरण, सांबर, लंगूर, आळशी अस्वल, उडणारी गिलहरी, रानडुक्कर आणि इतर अनेक प्राणी येथे हत्तींसोबतच फिरतात.
चिरंग-रिपू हत्ती राखीव हे हत्ती अभयारण्य मानस बायोस्फीअर रिझर्व्हचा एक भाग आहे आणि चिरांग आणि रिपू राखीव जंगलांनी बनलेले आहे. ईशान्य भारतातील वन्य आशियाई हत्तींच्या संख्येचा मोठा भाग या क्षेत्राला आपले घर म्हणतो. शेकडो वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींसह, प्रत्येक क्षणी पाहण्यासारखे काहीतरी आहे. मानस अभयारण्यमध्ये, एक वाघ उद्यान देखील आहे. असंख्य पक्षी, फुलपाखरांच्या 300 हून अधिक प्रजाती आणि इतर अनेक. हे जगातील एकमेव ठिकाण आहे जे पिग्मी हॉग्सचे निवासस्थान आहे. आसामचे हत्तीशी संबंध केवळ या अभयारण्यापुरते मर्यादित नाहीत.
राज्यात 5 हत्ती अभयारणे तसेच अनेक हत्ती कॉरिडॉर आहेत. या क्षेत्रातील इतर हत्ती अभयारण्य म्हणजे सोनितपूर, डायनिंग पटकई, काझीरंगा-कार्बी आंगलोंग आणि धनसिरी-लुंगडिंग. बोडोलँड टेरिटोरियल कौन्सिलद्वारे देखभाल केलेले हे क्षेत्र स्वर्गाचा एक तुकडा आहे. जे तुम्हाला कधीही सोडायचे नाही. शांत आणि सुंदर, ते त्याच्या परिसरात वनस्पती आणि प्राण्यांच्या साम्राज्याचे सर्वोत्तम प्रतीक ठरले आहे. याच धर्तीवर आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडून अभयारण्य उभारले गेले तर सध्या सुरू झालेला मानव - हत्ती संघर्ष कमी होण्यास मदत होईल.
भारतातील पहिले हत्ती अभयारण्य कुठे झाले?
झारखंडमधील सिंहभूम येथे भारतातील पहिले हत्ती अभयारण्य उभे राहिले.
एक हत्तीचा कळप किती भागात अधिवास करतो?
एक हत्तींचा कळप 20 ते 50 किलोमीटर भागात अधिवास करतो.
हत्ती बागायतींवर आक्रमण का करतात?
हत्तींना जेव्हा जंगलात पुरेसे खाद्य मिळत नाही, तेव्हा ते बागायतींवर आक्रमण करतात.