Latest

राजकारण नव्हे तर देशवासियांची सेवा हा आपला ध्यास ; पंतप्रधान मोदी

मोनिका क्षीरसागर

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : राजकारण नव्हे, तर देशवासियांची सेवा हा आपला ध्यास असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि.१२) गुजरातमधील भरुच येथे आयोजित करण्यात आलेल्या उत्कर्ष समारंभात बोलताना केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदी यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

जेव्हा सरकार इमानदारीने आणि एक संकल्प घेऊन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते, तेव्हा त्याचे किती सार्थक परिणाम मिळतात, याचे उदाहरण म्हणून उत्कर्ष समारंभाकडे पाहता येईल. असे सांगून मोदी पुढे म्हणाले की, अनेकदा माहितीअभावी लोक योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात. तर कधी कधी योजना कागदावरच राहतात, पण नीती-नियत, उद्देश स्वच्छ असेल आणि काम करण्याची इच्छा असेल, तर चांगले परिणाम आल्यावाचून राहत नाहीत. अर्थात यासाठी 'सबका साथ-सबका विकास' ही भावना देखील मनात असणे आवश्यक असते. केंद्रातील मागची आठ वर्षे सुशासन आणि गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित राहिलेली आहेत.

2014 साली जेव्हा आपण सत्तेत आलो, तेव्हा देशातील जवळपास निम्म्या लोकांकडे शौचालयाची सुविधा नव्हती. लसीकरण, विजेची जोडणी, बँक खाती आदी बाबतीत देश मागे होता. मात्र गेल्या आठ वर्षात वरील प्रगती साध्य झाली आहे. शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे, असे मोदी यांनी नमूद केले. आपण राजकारण करण्यासाठी नव्हे तर देशसेवेसाठी आलो आहोत, त्यामुळे कठीणातील कठीण योजनेला हात घालण्याची भीती वाटत नाही, असेही मोदी म्हणाले.

हेही वाचलत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT