राष्ट्रीय

अग्‍निवीरांना पेन्शन नसेल, तर खासदारांना कशासाठी? : वरुण गांधी

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली : भाजपचे खासदार वरुण गांधींनी पुन्हा एकदा स्वतःच्याच पक्षावर टीका केली आहे. अग्‍निपथ योजनेबाबत युवकांच्या समर्थनार्थ ट्विट करत पीलीभीतचे खासदार वरूण यांनी म्हटले आहे की, अग्‍निवीरांना पेन्शन मिळणार नसेल तर लोकप्रतिनिधींना ही सवलत कशासाठी? देशाच्या रक्षकांना पेन्शनचा अधिकार नसेल तर अग्‍निवीरांना पेन्शन मिळावी म्हणून मी माझी पेन्शन सोडण्यास तयार आहे. आमदार, खासदारांनी पेन्शन सोडून अग्‍निवीरांना पेन्शन मिळावी, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT