supreme court pudhari photo
राष्ट्रीय

Maharashtra Karnataka Border Dispute | महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर

तब्‍बल आठ वर्षांनंतर महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या मूळ दाव्यावर होणार होती सविस्तर सुनावणी

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra Karnataka Border Dispute

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नावरील सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार होती. मात्र, ती पुढे ढकलण्यात आली. न्यायालयात फक्त दोन न्यायाधीशांचे खंडपीठ उपलब्ध असल्यामुळे ही सुनावणी होऊ शकली नाही. सीमाप्रश्‍नासारख्या घटनात्मक आणि आंतरराज्यीय प्रकरणाची सुनावणी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणे आवश्यक असल्याने प्रकरण पुढे ढकलण्यात आले. विशेष म्हणजे, तब्बल आठ वर्षांनंतर महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या मूळ दाव्यावर सविस्तर सुनावणी होणार होती. या सुनावणीकडे सीमावासीयांचे लक्ष लागून रहिले होते.

महाराष्‍ट्राने केली होती लवकरात लवकर सुनावणीची विनंती

वरिष्ठ विधिज्ज्ञ ॲड. सी. एस. वैद्यनाथन आणि ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजी जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी लवकरात लवकर सुनावणी व्हावी, अशी विनंती केली होती. न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांनी ही विनंती मान्य करून बुधवारी सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली होती.

२००४ मध्‍ये महाराष्‍ट्र सरकारने घेतली होती सर्वोच्‍च न्‍यायालयात धाव

महाराष्ट्र सरकारने २००४ साली सर्वोच्च न्यायालयात हा दावा दाखल केला होता. त्यानंतर अनेक वर्षे विविध कारणांमुळे प्रत्यक्ष मुद्द्यावर सुनावणी होत नव्हती. अनेक लढे, आंदोलने करूनही न्याय मिळत नसल्यामुळे २००४ मध्ये महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT