IndiGo System Failure Explained Pudhari
राष्ट्रीय

IndiGo Crisis: 1,000 हून अधिक फ्लाइट्स रद्द; देशभरातील एअरपोर्ट्सवर गोंधळ, इंडिगोची यंत्रणा कशी बिघडली?

IndiGo System Failure Explained: इंडिगोने 1,000 पेक्षा जास्त फ्लाइट्स रद्द केल्याने देशभरातील एअरपोर्ट्सवर गोंधळ झाला असून प्रवासी तासन्‌तास अडकून पडले आहेत.

Rahul Shelke

Indigo Flight Cancellation Crisis: देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगो गेल्या काही दिवसांपासून गंभीर संकटाचा सामना करत आहे. एकट्या इंडिगोने 1,000 पेक्षा जास्त फ्लाइट्स रद्द केल्याने मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, हैदराबादसह देशभरातील एअरपोर्ट्सवर गोंधळ झाला आहे. प्रवासी तासन्‌तास अडकून राहिले असून एअरपोर्ट्सची अवस्था अक्षरशः रेल्वे स्टेशनसारखी झाली आहे.

संकट अचानक कसं वाढलं?

फ्लाइट लेट होणे व तांत्रिक बिघाड या समस्या आधीपासूनच होत्या. सुरुवातीला एअरलाइनने यासाठी तांत्रिक त्रुटी, हिवाळ्यातील नवे शेड्युल, एअरपोर्टवरील गर्दी आणि खराब हवामान जबाबदार असल्याचे सांगितले. पण खरी अडचण तेव्हा निर्माण झाली, जेव्हा भारत सरकारने Flight Duty Time Limitation (FDTL) चे नवे नियम लागू केले.

सरकारचे नवे नियम

नव्या नियमांनुसार पायलट्सना अधिक विश्रांती देणे बंधनकारक करण्यात आले, त्यामुळे इंडिगोकडील आधीच कमी असलेला स्टाफ आणखी कमी झाला आहे. आता पायलट्स नसल्याने अनेक फ्लाइट्स रद्द कराव्या लागल्या आहेत.

इंडिगोचं ‘मोठं नेटवर्क’च बनलं संकट

इंडिगो दररोज सर्वाधिक उड्डाणे करते; त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने फ्लाइट्स रद्द झाल्यावर एअरपोर्ट्सवर प्रचंड गोंधळ निर्माण झाला. सरकारने काही नियमांमध्ये सवलत दिली असली, तरी परिस्थिती अजूनही पूर्णपणे नियंत्रणात नाही. डीजीसीएने नुकताच एक नियम मागे घेतला आहे तो म्हणजे, पायलट्सची विश्रांती आता ‘ऑफ डे’मध्ये बदलता येणार नाही.
यामुळे पायलट रोटेशन थोडेसे सोपे होईल.

पायलट संघाची नाराजी, ‘इंडिगोने आधी तयारीच केली नाही’

पायलट संघांचे गंभीर आरोप:

  • इंडिगोला नवे नियम लागू होणार हे आधीपासून माहीत होतं.

  • तरीही कंपनीने स्टाफची भरती केली नाही.

  • उलट आधीपासूनच कमी लोकांवर अधिक कामाचा ताण वाढवला.

  • त्यामुळे संकट आणखी गंभीर झालं.

काही तज्ञांचे मत आहे की इंडिगोने मुद्दाम संकट वाढवून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून नियम शिथिल करता येतील.

परिणाम मात्र जनतेलाच भोगावे लागत आहेत

देशभरातील विमानतळावर हजारो प्रवासी अडकलेले आहेत, तिकीटांचे दर वाढलेले आहेत आणि एअरपोर्ट्सवर मोठी गर्दी झाली आहे. सरकारचे म्हणणे आहे की 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत परिस्थिती पूर्ववत होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT