पत्रकार परिषदेला संबोधित करताना परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते रणधीर जैस्वाल.  
राष्ट्रीय

Indus Waters Treaty suspension | प्रादेशिक तणाव कायम असताना भारताने केला सिंधू जल कराराच्या 'स्थगिती'चा पुनरुच्चार

पाकिस्‍तान सीमापार दहशतवादाला पाठबळ देणे थांबवत नाही, तोपर्यंत स्‍थगित कायम

पुढारी वृत्तसेवा

Indus Waters Treaty suspension : "जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठबळ देणे थांबवत नाही, तोपर्यंत 'सिंधू जल करार' (Indus Waters Treaty) स्थगितच राहील," याचा पुनरुच्चार भारताने आज (दि. ५) केला. साप्ताहिक पत्रकार परिषदेला संबोधित करताना परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की, एप्रिल २०२५ मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर १९६० चा हा पाणीवाटप करार निलंबित करण्यात आला असून तो पुढेही तसाच राहील.

पहलगाम दहशवादी हल्‍ल्‍यानंतर सिंधू जल करार स्‍थगित

२६ निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या पहलगाम हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने मे २०२५ मध्ये दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करत 'ऑपरेशन सिंदूर' ही लष्करी कारवाई सुरू केली होती. या कारवाईनंतरच हा करार स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सिंधू जल करार स्थगित होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटल्यानंतरही या धरणाचे दरवाजे बंदच आहेत. सिंधू जल कराराच्या व्यापक निलंबनाशी जोडलेली ही सातत्यपूर्ण पावले, या प्रदेशातील भारताचे जल व्यवस्थापन आणि जलविद्युत रणनीतीमधील बदल अधोरेखित करतात. परराष्ट्र मंत्रालयाने या करारावरील सुरू असलेल्या कायदेशीर वादांवरही भाष्य केले की, जलसाठा क्षमता आणि कराराच्या व्याख्येबाबत 'बेकायदेशीरपणे स्थापन करण्यात आलेल्या' लवाद न्यायालयाने (१५ मे २०२६ रोजी दिलेला निर्णय भारताने फेटाळला आहे. नवी दिल्लीने (भारत) या न्यायालयाला कधीही मान्यता दिली नसून, त्याचे सर्व कामकाज आणि निर्णय अवैध मानले आहेत.

पाकिस्‍तानच्‍या दहशतवादाला प्रत्युत्तर म्हणून करार स्थगित

माध्यमांशी बोलताना जैस्वाल यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानने सीमापार दहशतवादी कारवायांना दिलेला पाठिंबा विश्वासार्ह आणि कायमचा पूर्णपणे बंद करेपर्यंत हा करार पूर्ववत केला जाणार नाही. "पाकिस्तान पुरस्कृत सीमापार दहशतवादाला प्रत्युत्तर म्हणून सिंधू जल करार स्थगित ठेवण्यात आला आहे," असे जैस्वाल यांनी सांगितले. चिनाब आणि बियास नद्यांवरील भारताच्या जलविद्युत प्रकल्पांबाबत इस्लामाबादने (पाकिस्तान) केलेल्या ताज्या टीकेला त्यांनी फेटाळून लावले.

भारताच्या धोरणात्मक स्वायत्ततेचे महत्त्व

तुर्कीच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या टिप्पणीबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना जैस्वाल यांनी स्पष्ट केले की, भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध हे स्वतःच्या परराष्ट्र धोरणाच्या हितानुसार ठरतात. इतर देशांचे पाकिस्तानसोबत असलेल्या संबंधांबद्दलच्या चिंतेवर बोलताना जैस्वाल यांनी भारताच्या धोरणात्मक स्वायत्ततेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "आमच्या सर्व आंतरराष्ट्रीय संबंधांचे स्वतःचे स्वतंत्र स्थान आणि महत्त्व आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT