राष्ट्रीय

प्रियांका वाराणसीतून लढल्या असत्या तर मोदी पराभूत झाले असते

मोहन कारंडे

रायबरेली : अयोध्या तर हातची गेलीच; पण काशीही (वाराणसी) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कशीबशी राखली. मोदींच्या विरोधात काँग्रेसकडून राय यांच्याऐवजी प्रियांका गांधी उमेदवार असत्या तर मोदी २ ते ३ लाख मतांनी हमखास पराभूत झाले असते, असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे केले.

रायबरेलीला राहुल गांधी यांनी विजय सभा घेतली. ते म्हणाले, संविधान या देशाच्या आत्म्यालाच मोदी आणि शहा हे हानी पोहोचवत होते. द्वेषाचे राजकारण करत होते. तीन उद्योगपतींचेच भले करत होते. जनतेने यामुळेच त्यांना धक्का दिला. अयोध्येत राम मंदिर झाले; पण कार्यक्रमाला सगळे बडे होते, सामान्यांतून कुणीच नव्हते. रामही म्हणूनच रुसले आणि भाजप अयोध्याही राखू शकली नाही. प्रियांका गांधींचेही भाषण यावेळी झाले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT