नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शेतकरी नेत्यांच्या १२ सदस्यीय शिष्टमंडळाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची संसदेत भेट घेतली. या बैठकीत किमान आधारभूत किंमतीसाठी (एमएसपी) सरकारवर दबाव आणण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी विरोधी पक्षनेत्यांकडे केली. (Farmer leader Meet Rahul Gandhi)
या बैठकीनंतर बोलताना शेतकरी नेत्यांनी सांगितले की, संसदेत एमएसपीच्या मुद्द्यावरुन सरकारवर दबाव आणण्याची मागणी राहुल गांधी यांच्याकडे केली आहे. तसेच इंडिया आघाडीतील दुसऱ्या पक्षांकडेही ही मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शिष्टमंडळात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटकमधील किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चाच्या शेतकरी नेत्यांचा समावेश होता. (Farmer leader Meet Rahul Gandhi)
दरम्यान, बैठकी अगोदर शेतकरी नेत्यांना संसदेत प्रवेश करु दिला जात नसल्याचा आरोप राहुल गांधीनी केला. शेतकरी आहेत म्हणून त्यांना संसदेत येऊ देत नसल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. यानंतर शेतकरी नेत्यांना संसदेत प्रवेश मिळाला आणि राहुल गांधींच्या कार्यालयात बैठक झाली. (Farmer leader Meet Rahul Gandhi)
या बैठकीला काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल, काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश, अमरिंदर सिंह राजा वारिंग, सुखजिंदर सिंह रंधवा, गुरजित सिंह औजला, धरमवीर गांधी, डॉ. अमर सिंह, दीपेंद्र सिंह हुड्डा आणि जय प्रकाश यांच्यासह शेतकरी नेते उपस्थित होते.