Union Budget 2026 High-Speed Railway Corridor
नवी दिल्ली: देशातील दळणवळण व्यवस्था अधिक वेगवान आणि आधुनिक करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या विस्तारावर विशेष भर देण्यात आला असून, देशातील प्रमुख शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी सात नवीन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर बनवण्याची घोषणा केली आहे.
सध्या सुरू असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर, आता देशाच्या इतर भागांनाही हाय-स्पीड रेल्वेने जोडण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. प्रस्तावित सात मार्गांपैकी महत्त्वाचे मार्ग खालीलप्रमाणे आहेत:
मुंबई ते पुणे: या मार्गामुळे महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.
पुणे ते हैदराबाद: दक्षिण भारताला जोडण्यासाठी हा एक महत्त्वाचा दुवा ठरेल.
हैदराबाद ते चेन्नई: दक्षिण भारतातील दोन मोठी आयटी हब आता हाय-स्पीडने जोडली जाणार आहेत.
दिल्ली ते वाराणसी: उत्तर भारतातील धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांसाठी ही मोठी भेट असेल.
वाराणसी ते सिलिगुडी: ईशान्य भारताच्या प्रवेशद्वारापर्यंत रेल्वेचे जाळे विस्तारले जाईल.
हैदराबाद-बेंगळुरू
चेन्नई-बेंगळुरू
केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये एकूण 2,77,830 कोटी रुपयांची भांडवली तरतुद करण्यात आली आहे.
अर्थमंत्री सीतारमण यांनी यावेळी सांगितले की, "पुढील पाच वर्षांत, २० नवीन जलमार्ग सुरू केले जातील, ज्याची सुरुवात ओडिशामधील राष्ट्रीय जलमार्ग ५ पासून होईल, जो तालचेर आणि अंगुल या खनिजांनी समृद्ध क्षेत्रांना आणि कलिंगनगरसारख्या औद्योगिक केंद्रांना पारादीप आणि धामरा बंदरांशी जोडेल.