ऑपरेशन सिंदूर   (File Photo)
राष्ट्रीय

Operation Sindoor | 'जो भारताला आव्हान देण्याचे धाडस करेल तो ठेचला जाईल': भाजपचा पाकला थेट इशारा

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने जगाला आपली ताकद दाखवून दिली.

पुढारी वृत्तसेवा

BJP warning to Pakistan

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने जगाला आपली ताकद दाखवून दिली. जो कोणी भारताला आव्हान देण्याचे धाडस करेल, तो ठेचला जाईल, असे म्हणत भाजपने पाकिस्तानला खडे बोल सुनावले.

ऑपरेशन सिंदूरवर भाजपने पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार आणि प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, "पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी लोकांची मागणी ऐकली आणि बिहारच्या भूमीवरून बदला घेण्याची घोषणा केली. पंतप्रधानांच्या घोषणेनुसार, दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. तत्काळ कारवाई करण्याबाबत तणावाचे वातावरण होते, पाकिस्तानलाही हल्ल्याची माहिती होती, मात्र त्यांना हल्ल्याची तारीख कळू शकली नाही.

ऑपरेशन सिंदूरचा एक पैलू लष्करी कारवाईचा असला तरी अनेक कारवाया देखील करण्यात आल्या. सिंधू पाणी करार पुढे ढकलल्याने पाकिस्तानची आर्थिक स्थिती आणखी बिकट होईल. हे अशक्य काम यावेळी शक्य झाले. पाकिस्तानवर कठोर निर्बंध लादण्यात आले. पाकिस्तानला एकटे पाडण्यासाठी पंतप्रधान मोदींनी थेट २० देशांच्या प्रमुखांशी संवाद साधला, सर्व मोठ्या देशांनी भारताला पाठिंबा दिला.

संबित पात्रा म्हणाले की, ६-७ मे च्या रात्री दहशतवादावर निर्णायक हल्ला करण्यात आला. जगाने पाहिले की भारत सीमेपलीकडून दहशतवाद्यांना अचूकपणे लक्ष्य करू शकतो. या कारवाईचा उद्देश दहशतवाद्यांच्या त्या लपलेल्या ठिकाणांपर्यंत पोहोचणे, जिथे आतापर्यंत कोणीही पोहोचू शकलेले नाही, त्यांना नष्ट करणे, दहशतवाद्यांना मारणे आणि नागरिक आणि लष्करी तळांना हानी पोहोचवू नये हा होता. हे एक मोठे यश आहे. ज्या ९ दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य करण्यात आले. त्यात मुझफ्फराबाद कॅम्पचा समावेश होता. जिथे पहलगाम दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. भारताच्या सैन्याने राजकीय इच्छाशक्तीने सीमेपलीकडील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. अमेरिकाही बहावलपूरला आपले ड्रोन पाठवू शकली नाही, परंतु भारताने तेथील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. हा नवा भारत घुसतो आणि मारतो, असेही ते म्हणाले.

संबित पात्रा म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर १०० टक्के यशस्वी झाले. राफेलसोबत गेलेले सर्व वैमानिक सुरक्षित परतले. पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने त्यांचे अकरा हवाई तळ उद्ध्वस्त केले. पहिल्यांदाच एका देशाने अणुऊर्जा असलेल्या देशाच्या हवाई तळावर हल्ला केला. पाकिस्तानने ९ दहशतवादी अड्डे, ११ हवाई तळ, शंभराहून अधिक दहशतवादी, पन्नासहून अधिक सैनिक गमावल्याचेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT