बिहार विधानसभेच्‍या दुसर्‍या टप्‍प्‍यातील मतदानास आज (दि. ११) सकाळी प्रारंभ झाला. 
राष्ट्रीय

Bihar elections 2025 : बिहारमध्‍ये दुसर्‍या टप्‍प्‍यातील मतदानास प्रारंभ, 'निर्णायक' सीमांचल प्रदेशावर लक्ष केंद्रित

दुसऱ्या टप्प्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ६०.४०% मतदानाची नोंद

पुढारी वृत्तसेवा

Bihar elections Phase 2 : बिहार विधानसभेच्‍या दुसर्‍या टप्‍प्‍यातील मतदानास आज (दि. ११) सकाळी प्रारंभ झाला. मगध, चंपारण आणि सीमांचल या निवडणुकीसाठी निर्णायक म्‍हणून ओळखल्‍या जाणार्‍या भागात मतदान होत आहे. दरम्‍यान, दुपारी ३ वाजेपर्यंत ६०.४०% मतदानाची नोंद झाली.

सीमांचल प्रदेशात निर्णायक लढत

विधानसभा निवडणुकीच्‍या दुसर्‍या टप्प्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, सीतामढी, मधुबनी, सुपौल, अररिया आणि किशनगंज यासारख्या जिल्‍हे आहेत. यातील बहुतांश जिल्हे नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या सीमांचल प्रदेशात येतात. या जिल्‍ह्यांमध्‍ये मुस्लिम मतदारांची संख्या अधिक आहे. यामुळे एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्‍यासाठी संघर्ष आहे. सत्ताधारी एनडीएने त्यांच्या इंडिया आघाडातील पक्षांवर घुसखोरांना संरक्षण देण्याचा आरोप केला आहे.

दुसर्‍या टप्‍प्‍यात प्रादेशिक्षक पक्ष आघाडीवर

तसेच या टप्‍प्‍यात प्रादेशिक्षक पक्ष हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM), विकासशील इन्सान पार्टी (VIP), राष्ट्रीय लोक मोर्चा (RLM) आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षही आघाडीवर आहेत. माजी मुख्‍यमंत्री जीतन राम मांझी यांच्या नेतृत्वाखालील हिंदुस्तानी अवाम मोर्चा हा सहा जागांपैकी चार जागांवर निवडणूक लढवत आहे. मुकेश साहनी यांच्या नेतृत्वाखालील विकासशील इन्सान पार्टी सुमारे १५ जागांवर निवडणूक लढवत आहेत, या टप्प्यातील त्यांची कामगिरी महत्त्वाची मानली जात आहे. महाआघाडीला निर्णायक यश मिळाले तर साहनी हे उपमुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. उपेंद्र कुशवाहा यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा पक्ष सहा जागांवर निवडणूक लढवत आहे. पक्षाच्या कामगिरीचा एनडीएच्या भवितव्यावर परिणाम होऊ शकतो, असे मानले जात आहे. सीमांचलमध्ये असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन हा पक्ष किशनगंज, अररिया आणि पूर्णियासारख्या मतदारसंघांमध्ये मुस्लिम मते एकत्रित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. पक्ष २०२० पासून पाच जागांवर मिळवलेल्या विजयाची पुनरावृत्तीच्‍या प्रयत्‍नात आहे.

बहुसंख्य मतदान केंद्रे ग्रामीण भागात

दुसर्‍या टप्‍प्‍यात ४५,३९९ मतदान केंद्रांवर मतदान होईल, ज्यामध्ये ग्रामीण भागात बहुसंख्य मतदान केंद्रे असतील. नवादा जिल्ह्यातील हिसुआ मतदारसंघात सर्वाधिक मतदार आहेत, तर अनेक मतदारसंघांमध्ये २२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.एकूण मतदारांपैकी १.७५ कोटी महिला आहेत आणि त्यापैकी बहुसंख्य ३०-६० वयोगटातील आहेत, जे या महत्त्वपूर्ण टप्प्यात विविध लोकसंख्या सहभागी असल्याचे अधोरेखित करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT