पुढारी ऑनलाईन: देशभरात आज राम मंदिरांमध्ये रामनवमी उत्सव साजरा केला जात आहे. इंदूर येथील महादेव मंदिरात विहीरीचे छत कोसळून २५ हून अधिकजण पाण्यात कोसळलेच. यानंतर आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील दुवा गावातील मंदिर परिसरातील कमानीला भीषण आग लागली, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.
आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील वेणुगोपाल स्वामी मंदिरात रामनवमी सोहळ्यादरम्यान ही दुर्घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागल्यानंतर भाविकांमध्ये घबराट निर्माण झाली. मंदिर परिसरात धावपळ सुरु झाली. काही काळ गोंधळ माजला. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत जिवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.