Latest

नाशिक : विजेच्या धक्क्याने दोन भावांचा मृत्यू

गणेश सोनवणे

ञ्यंबकेश्वर(जि. नाशिक) : येथील तळेगाव-काचुर्ली येथील तुकाराम पारधी (वय 30) आणि ज्ञानेश्वर पारधी (वय 22) यांचा बुधवारी (दि.25) विजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. टोमॅटो पिकाला पाणी भरण्यासाठी वीजपंप जलपरी पाण्यात सरकवताना हा अपघात झाला.

तळेगाव काचुर्ली येथील किकवी नदीपात्रात बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास नदीपात्रातील पाणी कमी झाले म्हणून मोठा भाऊ तुकाराम पाण्यातील जलपरी पुढे ढकलण्यास गेला असता जलपरीला विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला जोरदार धक्का बसला. दरम्यान काठावर उभा असलेला लहान भाऊ ज्ञानेश्वरने हा प्रकार पाहुन त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र तो देखील विद्युत प्रवाहात सापडला. जोरदार धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. त्यांना ञ्यंबकेश्वर उपजिल्हा रूग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. तुकाराम हा विवाहीत असून त्याला लहान मुले आहेत तर ज्ञानेश्वर हा अविवाहीत होता. दोघे सख्खे भाऊ असल्याचे समजते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT