जालना; पुढारी वृत्तसेवा : आज (दि. ११) मुंबईत मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना ते म्हणाले की, मराठा आरक्षण हाच माझा उपचार आहे, त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार. दुसऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून आमच्यावर किती अन्याय कराल, आता आमच्याकडेही बघा असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले. ओबीसीवर देखील अन्याय करू नका आणि आमच्यावर पण अन्याय करू नका. पण आम्हाला सरसकट आरक्षण द्या भिजत घोंगडे ठेऊ नका, असंही ते म्हणाले. (Manoj Jarange Patil News)
जे काही करायच आहे ते करा पण आरक्षण द्या. सर्व पक्ष आता एकत्र येत आहेत. हे सर्वपक्षीय नेते आम्हाला किती साथ देतात आणि किती काम करतात? यांचं प्रेम किती खोटं आहे आणि किती खरं आहे हे आज उघड होणार आहे असंही पाटील यावेळी म्हणाले.
तुम्ही फक्त चर्चा करण्यासाठी येतात तुम्ही एकत नाही, तुम्ही पत्र घेऊन येता का? मग मी का एकू असा टोलाही त्यांनी यावेळी सरकारला लगावला. यावेळी जरांगे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर देखील टीका केली. तुमच्याकडे निजाम होते की नव्हते मला माहित नाही.नवगते तर मग घेऊन जायचे होते अशी टीका त्यांनी केली. (Manoj Jarange Patil News)
हे ही वाचा :