नागपूर; पुढारी वृत्तसेवा : "मला राजकीय बोलायचं नाही आहे. ही चांगली गोष्ट आहे की, प्रत्येक पार्टीला कर्नाटकची जनता संधी देत आहे. काल आम्ही सत्तेत होतो आज काँग्रेस आहे. उद्या अजून कोणी राहील. प्रत्येकासाठी हे चांगले आहे. कर्नाटकमध्ये मोदी जाऊनही निवडून येऊ शकले नाहीत, अशी टीका होत आहे. यावर उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी जिंकतील," असा विश्वास अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा :