नागपूर

नागपूर : कंत्राटी भरतीविरोधात विद्यार्थ्यांचा काटोल तहसील कार्यालयावर मोर्चा

Shambhuraj Pachindre

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या कंत्राट भरती विरोधात नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये विद्यार्थी युवक-युवतींनी शुक्रवारी (दि.१३) तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
राज्य सरकारने काढलेला कंत्राट भरतीचा जीआर रद्द करावा, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी युवक-

युवती या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. काटोलच्या धंतोली चौकातून निघालेला हा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांना अनिल देशमुख यांनी कंत्राट भरती झाल्यास काय होऊ शकते? याचे महत्त्व समजून सांगितले. यावेळी सरकार विरोधात या संतप्त युवकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT