नागपूर, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडूकीमध्ये शेवटी महाराष्ट्रात चमत्कार घडलाच. संविधान वाचविण्यासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी तसेच हुकूमशाही राजवटीला हद्दपार करण्यासाठी. तसेच भाजपाचे शेतकरी विरोधी धोरण, महागाई आणि बेरोजगारी याला कंटाळून जनतेने हा निवडणुकीचा कल महाराष्ट्रात दिला आहे. शेवटी महाराष्ट्रात चमत्कार घडलाच अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉग्रेस नेते, माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांनी दिली.
संविधान वाचविण्यासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी व हुकूमशाही राजवटीला हद्दपार करण्यासाठी. तसेच भाजपाचे शेतकरी विरोधी धोरण, महागाई व बेरोजगारी याला कंटाळून जनतेने हा निवडणुकीचा कल महाराष्ट्रात दिला आहे यावर भर दिला. चमत्कार घडणार या आशयाचे बॅनर देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी गेले काही दिवस लक्षवेधी ठरत होते. वर्धा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाने काबीज केला असून देशमुख यांनी त्यांचे भाचे अमर काळे यांचे केलेले परिश्रम सार्थकी लागले. अशी भावना देखील व्यक्त केली.
हेही वाचा :