नागपूर, पुढारी वृत्तसेवा : भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असे व्यक्तव्य केले. यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, आज ( दि. ४ ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नागपुरात माध्यमांनी याबाबत विचारले असता, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याची दखल घेतली नाही. अख्या जगाला माहित आहे की, शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवराय यांचेसंदर्भात आक्षेपार्ह विधाने होत असल्याने काँग्रेसने ही भाजपची विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याचा आरोप केला. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजप शिवराय यांचा वापर केवळ राजकारणासाठी करीत असल्याचा आरोप केला. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील याविषयीचा जाब जनता विचारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा लोंढे यांनी दिला.
हेही वाचा :