चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : ट्रकमध्ये जनावरे कोंबून घेवून जाणाऱ्या ट्रकचा छत्तीसगडमधील मूल येथे बुधवारी (दि.17) अपघात झाला. या अपघातात सुमारे 16 जनावरे मृत झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. अपघातानंतर ट्रक चालकासह इतर ट्रकमधील इतर संथयित आरोपी फरार झाले आहेत. ही जनावरे गडचिरोली मधून हैद्राबादला कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची शंका वर्तविली जात आहे.
मूलजवळ आकापूर वळणावर (सीजी 07 सीबी 0717) या क्रमांकाचा ट्रक उलटला. या ट्रकमध्ये 30 ते 35 जनावरे कोंबून भरली होती. ट्रक उलटल्यामुळे यामधील सोळा जनावरे ट्रक खाली सापडून मृत्यमुखी पडली. अन्य जनावरे अपघातानंतर पळाली. अपघातानंतर ट्रक चालक आणि इतर सहकारी पळून गेल्यामुळे जनावरे कत्तलीसाठी नेण्यात येत होती, अशी शंका वर्तविली जात आहे. या घटनेचा तपास मूल पोलिस घेत आहेत. पुढील तपास पोलिस निरिक्षक सुमीत परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली मूल पोलिस करीत आहे.